शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 21:55 IST

Corona Vaccination: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने कोरोनाचा फैलाव, लसीकरण, इंधनदरवाढ यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिव्याखाली अंधार, समजलं तर बरं आहे, असा टोला स्मृति इराणी यांनी राहुल गांधींना नाव न घेता लगावला आहे. (bjp smriti irani replies rahul gandhi over corona vaccination criticism)

केंद्रातील मोदी सरकारच्या लसीकरण मोहिमेवर राहुल गांधींनी श्वेतपत्रिका काढत टीका केली. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी पलटवार केला आहे. ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे, या शब्दांत स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 

लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची तीव्र नाराजी; पालिका, ठाकरे सरकावर ताशेरे

सर्वाधिक मृत्यूदर असणारी काँग्रेसशासित राज्य

कोरोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि कोरोना बळी आहेत? काँग्रेसशासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेसशासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधी आवाज उठत असून, त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका इराणी यांनी केली आहे. 

लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला. लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली? आणि त्यानंतर पुन्हा त्यावरून घुमजाव कुणी केले? काँग्रेसने, अशी टीकाही स्मृति इराणी यांनी केली आहे. तसेच “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असा खोचक टोलाही इराणी यांनी लगावला आहे.

फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. आपण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवू शकलो नाही. पंतप्रधानांचे अश्रू सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. त्यांचे अश्रू त्यांना वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण त्यांनी हे गांभीर्याने घेतले नाही कारण त्यांचे सगळे लक्ष बंगालच्या निवडणुकीवर होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीPoliticsराजकारण