शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 21:55 IST

Corona Vaccination: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने कोरोनाचा फैलाव, लसीकरण, इंधनदरवाढ यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिव्याखाली अंधार, समजलं तर बरं आहे, असा टोला स्मृति इराणी यांनी राहुल गांधींना नाव न घेता लगावला आहे. (bjp smriti irani replies rahul gandhi over corona vaccination criticism)

केंद्रातील मोदी सरकारच्या लसीकरण मोहिमेवर राहुल गांधींनी श्वेतपत्रिका काढत टीका केली. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी पलटवार केला आहे. ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे, या शब्दांत स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 

लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची तीव्र नाराजी; पालिका, ठाकरे सरकावर ताशेरे

सर्वाधिक मृत्यूदर असणारी काँग्रेसशासित राज्य

कोरोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि कोरोना बळी आहेत? काँग्रेसशासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेसशासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधी आवाज उठत असून, त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका इराणी यांनी केली आहे. 

लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला. लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली? आणि त्यानंतर पुन्हा त्यावरून घुमजाव कुणी केले? काँग्रेसने, अशी टीकाही स्मृति इराणी यांनी केली आहे. तसेच “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असा खोचक टोलाही इराणी यांनी लगावला आहे.

फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. आपण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवू शकलो नाही. पंतप्रधानांचे अश्रू सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. त्यांचे अश्रू त्यांना वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण त्यांनी हे गांभीर्याने घेतले नाही कारण त्यांचे सगळे लक्ष बंगालच्या निवडणुकीवर होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीPoliticsराजकारण