शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 21:55 IST

Corona Vaccination: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने कोरोनाचा फैलाव, लसीकरण, इंधनदरवाढ यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिव्याखाली अंधार, समजलं तर बरं आहे, असा टोला स्मृति इराणी यांनी राहुल गांधींना नाव न घेता लगावला आहे. (bjp smriti irani replies rahul gandhi over corona vaccination criticism)

केंद्रातील मोदी सरकारच्या लसीकरण मोहिमेवर राहुल गांधींनी श्वेतपत्रिका काढत टीका केली. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी पलटवार केला आहे. ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे, या शब्दांत स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 

लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची तीव्र नाराजी; पालिका, ठाकरे सरकावर ताशेरे

सर्वाधिक मृत्यूदर असणारी काँग्रेसशासित राज्य

कोरोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि कोरोना बळी आहेत? काँग्रेसशासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेसशासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधी आवाज उठत असून, त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका इराणी यांनी केली आहे. 

लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला. लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली? आणि त्यानंतर पुन्हा त्यावरून घुमजाव कुणी केले? काँग्रेसने, अशी टीकाही स्मृति इराणी यांनी केली आहे. तसेच “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असा खोचक टोलाही इराणी यांनी लगावला आहे.

फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. आपण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवू शकलो नाही. पंतप्रधानांचे अश्रू सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. त्यांचे अश्रू त्यांना वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण त्यांनी हे गांभीर्याने घेतले नाही कारण त्यांचे सगळे लक्ष बंगालच्या निवडणुकीवर होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीPoliticsराजकारण