शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

"सत्तेभोवती पिंगा घालत बसलात तर बळ-बळ करताना ही जनता पळ काढायला लावेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:15 IST

BJP Pravin Darekar And Thackeray Government : भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर अलीकडेच नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पाळत ठेवत असल्याचं गंभीर आरोप केला होता. यानंतर आता भाजपाचे नेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. "बळ-बळ करणाऱ्यांना जनता पळ काढायला लावेल" असं म्हणत प्रविण दरेकर यांनी सणसणीत टोला लगावला आहे. 

प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालणारे महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करतायत,परंतु जनता त्यांना 'पळ' काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही!" असं दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच "यांना पक्षाच्या स्वबळाचं पडलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही. त्याच्या हातात बळ राहिलेलं नाही. आज कामगार देशोधडीला लागले आहेत. त्यांच्या हातात कोणतंही बळ राहिलेलं नाही आणि अशा वेळी यांना स्वबळाचं त्य़ाठिकाणी पडलेलं आहे. पण जर अशाप्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर याठिकाणी बळ-बळ करताना ही जनता त्यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे" असं दरेकर यांनी म्हटलं आहे. 

आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष असलेल्या नानांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, या विधानावरून महाविकास आघाडीमध्ये वाद वाढू लागल्यानंतर नाना पटोले यांनी सारवासारव सुरू केली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. काल्पनिक कहाण्या रचून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव विरोधकांनी आखला आहे. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

पाळत ठेवल्याच्या सनसनाटी आरोपांनंतर नाना पटोलेंची पलटी, भाजपाला टोला लगावत म्हणाले...

आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, सध्या आमच्याविरोधात काल्पनिक कहाण्या रचण्याचे काम सुरू आहे. मी पुण्यात असताना काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा मी म्हणालो होतो की, राज्यात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादामध्ये वाढ झाली आहे. आमचे दौरे सुरू आहेत. त्याचा अहवाल रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. तसेच राज्य सरकारसोबतच असा अहवाल केंद्र सरकारकडेही जात असतो. प्रत्येत घडामोडीची माहिती राज्य आणि केंद्र सरकारला मिळत असते. प्रत्येक जिल्ह्याची, विभागाची माहिती सरकारला मिळत असते. तशीच माझी आणि पक्षाच्या इतर नेत्यांची माहितीही दिली जात असते, ही प्रक्रिया मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. मात्र माझ्या वक्तव्याचा चुकीचा उल्लेख काढला गेला. दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी आमचे वैर नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल. मात्र भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यासाठी काल्पनिक कहाण्या पेरल्या जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण