शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं वाटत नाही”; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

By प्रविण मरगळे | Updated: January 4, 2021 09:00 IST

West Bengal Assembly Election: मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये राजकारण पेटलं, ममता बॅनर्जींच्या हत्येबाबत भाजपा खासदाराचं आक्षेपार्ह विधानममता सरकारचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी भाजपावर हत्या करण्याचा कट रचल्याचा केला आरोपपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत लोकांची मते मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत - भाजपा

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या भाजपामध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. यात पश्चिम बंगालच्या बैरकपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे.

सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या होवो हे वाटत नाही

खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवं आणि केंद्रीय सुरक्षा कवच मागायला हवं, पश्चिम बंगालच्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं आम्हाला वाटत नाही.

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं. या विधानानंतर पश्चिम बंगालमधील राजकारण पेटलं होतं, भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी हिंसक चकमकी घडत असल्याच्या घटना होतात, यात दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. (West Bengal Assembly Election)

बंगालच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनीही साधला निशाणा

पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या विधानावर पलटवार केला आहे. घोष म्हणाले की, राज्यातील ममता सरकार पश्चिम बंगालच्या जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीच अशाप्रकारे काहीही विधानं करत आहेत. ममता बॅनर्जी म्हणतात, काही लोक माझी हत्या करण्याचं षडयंत्र रचत आहेत, पण असा गुन्हा कोणी का करेल? पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत लोकांची मते मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत. ज्यामुळे लोकांचा सहानुभूती ममता बॅनर्जी यांना मिळेल असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात

विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येतोय, तसे भाजप नेते दर आठवड्याला येथे येऊन मुक्काम करत आहेत. मात्र, आम्ही ३६५ दिवस पश्चिम बंगालमध्येच असतो. भाजप नेते फाइव्ह स्टार हॉटेलचे जेवण जेवतात आणि आदिवासी समाजासोबत जेवण करत असल्याचा आभास निर्माण करत बंगालच्या जनतेची भाजपकडून दिशाभूल करतंय, भाजपाने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हानच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी