शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

“सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं वाटत नाही”; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

By प्रविण मरगळे | Updated: January 4, 2021 09:00 IST

West Bengal Assembly Election: मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये राजकारण पेटलं, ममता बॅनर्जींच्या हत्येबाबत भाजपा खासदाराचं आक्षेपार्ह विधानममता सरकारचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी भाजपावर हत्या करण्याचा कट रचल्याचा केला आरोपपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत लोकांची मते मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत - भाजपा

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या भाजपामध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. यात पश्चिम बंगालच्या बैरकपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे.

सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या होवो हे वाटत नाही

खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवं आणि केंद्रीय सुरक्षा कवच मागायला हवं, पश्चिम बंगालच्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं आम्हाला वाटत नाही.

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं. या विधानानंतर पश्चिम बंगालमधील राजकारण पेटलं होतं, भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी हिंसक चकमकी घडत असल्याच्या घटना होतात, यात दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. (West Bengal Assembly Election)

बंगालच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनीही साधला निशाणा

पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या विधानावर पलटवार केला आहे. घोष म्हणाले की, राज्यातील ममता सरकार पश्चिम बंगालच्या जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीच अशाप्रकारे काहीही विधानं करत आहेत. ममता बॅनर्जी म्हणतात, काही लोक माझी हत्या करण्याचं षडयंत्र रचत आहेत, पण असा गुन्हा कोणी का करेल? पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत लोकांची मते मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत. ज्यामुळे लोकांचा सहानुभूती ममता बॅनर्जी यांना मिळेल असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात

विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येतोय, तसे भाजप नेते दर आठवड्याला येथे येऊन मुक्काम करत आहेत. मात्र, आम्ही ३६५ दिवस पश्चिम बंगालमध्येच असतो. भाजप नेते फाइव्ह स्टार हॉटेलचे जेवण जेवतात आणि आदिवासी समाजासोबत जेवण करत असल्याचा आभास निर्माण करत बंगालच्या जनतेची भाजपकडून दिशाभूल करतंय, भाजपाने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हानच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी