शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भाजपा आमदाराला विधिमंडळ गेटवरच अडवलं; ‘दादा स्टाईलनं’ अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:11 IST

सोमवारी विधिमंडळ अधिवेशन सुरु होणार असल्याने आधी रिपोर्ट नंतरच विधिमंडळ प्रवेश दिला जात होता. अनेकांचे रिपोर्ट विधिमंडळ गेटवरच संबंधितांना सोपवण्यात आले.

ठळक मुद्देभाजपा आमदारांसोबत काही शिवसेना आमदारही गेटवरच अडकले होते२४ तासानंतरही आमदारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला नसल्याने गोंधळरिपोर्ट पाहूनच अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार, कर्मचाऱ्यांना विधान भवनात प्रवेश दिला जात होता

मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी, रविवारी या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात आली. पण अनेकांना रिपोर्टसाठी ताटकळतच राहावं लागलं.

सोमवारी विधिमंडळ अधिवेशन सुरु होणार असल्याने आधी रिपोर्ट नंतरच विधिमंडळ प्रवेश दिला जात होता. अनेकांचे रिपोर्ट विधिमंडळ गेटवरच संबंधितांना सोपवण्यात आले. पण स्वॅब घेऊनही अनेकांचे रिपोर्ट न मिळाल्याने विधिमंडळ गेटवर आमदारांमध्ये गोंधळ उडाला. २४ तासानंतरही आमदारांच्या चाचणीचा अहवाल आला नाही. त्यामुळे आतमध्ये जाता येत नव्हतं. सरकारने एजेंट ठेवलेत का? अशा शब्दात विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपा आमदारांसोबत काही शिवसेना आमदारही गेटवरच अडकले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे पोहचले. हा संपूर्ण प्रकार आमदारांनी अजित पवारांच्या कानावर घातला. त्यानंतर अजितदादांनी आपल्या शैलीत अधिकारी आणि कर्मचारी यांचा चांगलाच समाचार घेतला. रिपोर्ट मिळाला नाही तर कामकाज चालणार कसे? आमदारांचे रिपोर्ट नाहीत मग आतमध्ये प्रवेश नाही. ताबडतोब सर्व आमदारांचे चाचणी रिपोर्ट द्या आणि सर्वांना आतमध्ये सोडा असा आदेशच अजित पवारांनी दिला. अजित पवारांनी खडसावल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देण्यात आले. त्यानंतर या आमदारांना विधिमंडळात प्रवेश देण्यात आला.

विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना पार पडणार अधिवेशन

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते क्वॉरंटाइन झाले आहेत, ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे आजपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

अधिवेशनाच्या काळात एक-दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत, असे घडले असेल. मात्र, पूर्ण अधिवेशन काळात अध्यक्ष आलेच नाहीत, असे याआधी कधीही घडलेले नाही. पटोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद आहे. तसेच ते फोनवर येऊ शकणार नाहीत, असे त्यांच्या निवासस्थानी सांगण्यात आले. अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरण्याची सूचना देण्यात आली आहे.

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कामकाज सांभाळणार

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

बैठक व्यवस्थेत बदल

सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले आहे.

टॅग्स :BJPभाजपाAjit Pawarअजित पवारHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस