शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

"ठाकरे सरकारला दोनच गोष्टींची चिंता, एक म्हणजे...", आशिष शेलारांचा निशाणा

By ravalnath.patil | Updated: November 21, 2020 14:20 IST

Ashish Shelar : सरकार आहे की छळावणुकीचे केंद्र आहे? असा सवाल करत सरकारने सर्व घटकांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावी, असे आशिष शेलार म्हणाले.

ठळक मुद्दे'सध्याचे सरकार अकार्यक्षम आहे. पुण्याच्या कोरोना आकडेवारीबाबत मी सांगण्याची गरज नाही. ''पब, बार आणि रेस्टॉरंट नियम घालून उघडली जाऊ शकतात तर योग्य नियम घालून मंदिरं का उघडली जाऊ शकतात?'

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने वर्षभरात जी दयनीय अवस्था केली आहे. त्याविरोधात मतदारांनी कौल द्यावा. इतकं पळकुटे आणि पराधीन सरकार यापूर्वी कधी बघितले नाही. जनतेच्या प्रश्नावर मंत्री पळ काढतात किंवा पराधीन आहोत, असे उत्तर देतात, अशा शब्दांत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेचा जाहीर निषेध करतो. महाआघाडीचा एक नेता म्हणाला, 'मतदारांशी संभाळून बोला ते रेकॉर्ड करतील'. अशा प्रकरारे मतदारांवर अविश्वास दाखवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

याचबरोबर, ठाकरे सरकार दोनच गोष्टींची चिंता करते. बॉलिवूड मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. ते बॉलिवूडची चिंता करतात आणि सुपुत्र पब आणि बारची चिंता करतात, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

सध्याचे सरकार अकार्यक्षम आहे. पुण्याच्या कोरोना आकडेवारीबाबत मी सांगण्याची गरज नाही. पब, बार आणि रेस्टॉरंट नियम घालून उघडली जाऊ शकतात तर योग्य नियम घालून मंदिरं का उघडली जाऊ शकतात? कोणीही मागणी करत नसताना पब, रेस्टॉरंटची वेळ का उघडली? असे सवाल आशिष शेलार यांनी केले.

याशिवाय, शाळा सुरू करण्याबाबत सरकारने संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे. राज्य सरकारने त्या शाळा सुरू करण्याची तारीख दिली. ती देताना जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांची बैठकही घेतली नाही. शिक्षकांचेही प्रश्न आहेत. सरकार आहे की छळावणुकीचे केंद्र आहे? असा सवाल करत सरकारने सर्व घटकांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावी, असे आशिष शेलार म्हणाले.

सरकारने राज्यपालांकडे 12 नावे दिले आहेत. राज्यपालांना लिखित अलिटीमेंटम कसे देता येईल? हा शब्दच मान्य नाही. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे नसली तरी आम्ही काम एकत्रित करतो, सामूहिक करतो. माझ्याशी चर्चा करून निर्णय घेतला, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

आशिष शेलार यांनी वीज बिलावरूनही ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "देवेंद्र सरकार असताना 19 हजार कोटींचे थकबाकी होतीच, आम्ही बाहेर पडताना 30 हजार कोटींची थकबाकी होती. 45 लाख शेतकऱ्यांना मदत केलेली थकबाकी होती. त्याची चौकशी करताना 45 लाख शेतकऱ्यांना चौकशीच्या आड आणले तर याद राखा गाठ आमच्याशी आहे. यांचे आपापसात जमत नाही म्हणून जनतेने बिल भरणे पटत नाही. तुमचे मुख्यमंत्री ऐकत म्हणून नागरिकांनी बिल भरावे असे म्हणू शकत नाही."

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र