शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आता सगळ्यांना पवित्र व्हावं लागेल आणि ते काम सीबीआयच करेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 07:51 IST

BJP And TMC : भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आमनेसामने आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आमनेसामने आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान टीव्हीवरील एका शो मध्ये चर्चेसाठी नेतेमंडळीना बोलवण्यात आलं असता त्यांनी एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँगेसच्या काही नेत्यांवर सीबीआयची कारवाई होत असल्याचा मुद्दा चर्चेसाठी उपस्थित झाला होता. या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना घेरण्यास सुरुवात केली. 

सीबीआयने कोलकातामध्ये एका तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घर आणि कार्यालयासह काही ठिकाणांवर छापेमारी केली. गोवंश तस्करीच्या प्रकरणात सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर ही कारवाई केली. या कारवाईबाबत तृणमूलचे नेत्यांनी भाजपा सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यांवरून भाजपाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी टीएमसी नेते विवेक गुप्ता यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. "सीबीआय ही एक स्वायत्त संस्था आहे. मला या संस्थेचा आदर आहे. पण कधीकधी मला असा संशय येतो की या संस्थांना राजकीय चावी लावली जाते आहे" असं विवेक गुप्ता यांनी म्हटलं आहे.

"तृणमूल काँग्रेसने आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे जाण्याचे दिवस आले"

भाजपाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी गुप्ता यांना उत्तर दिलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते परप्रांतीय आणि तृणमूलचे कार्यकर्ते भूमिपुत्र अशी एक नवी संकल्पना मांडली जात आहे. पण तृणमूल काँग्रेसने आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे जाण्याचे दिवस आले. जाताजाता एक चांगलं काम करून जा. ते म्हणजे ज्या गुन्हेगारांना तुम्ही संरक्षण दिलं आहे त्यांना पाठिशी घालू नका. आणि प्रश्न राहिला सीबीआयचा… सीबीआय स्वतंत्र संस्था आहे. ते त्यांचं काम योग्यप्रकारे करतील. आता सगळ्यांना पवित्र व्हावं लागेल आणि ते काम सीबीआयच करेल" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भाजपाचा ममतांना 'धक्के पे धक्का'!; आता हा बडा नेता 5,000 कार्यकर्त्यांसह हातात घेणार 'कमळ' 

ममता बॅनर्जी यांना भाजपाकडून एका पाठोपाठ एक हादरे देणं सुरूच आहे. नुकताच सुबेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर आता आपला भाऊ आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सौमेंदू अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये सामील होणार असल्याचे सुवेंदू यांनी शुक्रवारी सांगितले. सौमेंदू यांना नुकतेच कोन्टाई नगरपालिकेच्या प्रशासक पदावरून दूर करण्यात आले होते. सुवेंदू यांनी पूर्व मिदनापूर येथे एका बैठकीत सांगितले, की माझा भाऊ सौमेंदू काही नगरसेवक आणि तृणमूल काँग्रेसच्या 5,000 कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहे. सौमेंदू कोन्टाई येथे शुक्रवारी सायंकाळी भाजपात प्रवेश करतील. यामुळे आता तृणमूल काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणBJPभाजपाtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभाग