"देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र, तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. यावरून आता भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांन जयंत पाटील यांना टोला लगावला आहे."किमान शरद पवार यांना तरी विचारायचं. ते आता फेसबुक लाईव्हवर म्हणाले केंद्र सहकार्य करत आहे. इथलं कोरोना हाताळणीतील ढळढळीत अपयश लपवयाला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे. पण शरद पवार यांना खोटं पाडू नका," असं उपाध्ये म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जयंत पाटील यांना टोला लगावला.
"अपयश लपवायला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे, पण शरद पवारांना खोटं पाडू नका"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:09 IST
Corona Vaccine : भाजपचा जयंत पाटलांना टोला, केंद्राकडून लसींचा योग्यप्रकारे पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप
अपयश लपवायला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे, पण शरद पवारांना खोटं पाडू नका
ठळक मुद्देकेंद्राकडून लसींचा योग्यप्रकारे पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप