"माशा मारण्याची स्पर्धा तर....; सत्ताधारी घरात लपून आहेत", भाजपा नेत्याची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 03:53 PM2021-05-15T15:53:49+5:302021-05-15T17:01:05+5:30

Keshav Upadhye : माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे.

BJP Leader Keshav Upadhye slam to NCP leader Nawab Malik and Maha Vikas Aghadi Government Over tweets against Devendra Fadnavis | "माशा मारण्याची स्पर्धा तर....; सत्ताधारी घरात लपून आहेत", भाजपा नेत्याची टीका 

"माशा मारण्याची स्पर्धा तर....; सत्ताधारी घरात लपून आहेत", भाजपा नेत्याची टीका 

Next
ठळक मुद्देमराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

मुंबई - देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. याला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांनी ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे. (BJP Leader Keshav Upadhye slam to NCP leader Nawab Malik and Maha Vikas Aghadi Government Over tweets against Devendra Fadnavis)

केशव उपाध्ये यांनी नवाब मलिक यांच्या ट्विटला रिट्विट केले आहे. "आहे. माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांनी ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहे आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करत आहेत. आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? १० बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच!", असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी नवाब मलिक यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मराठा आरक्षणावरून राज्य सरकार केद्राकडे बोट दाखवत आहे. केंद्रानेच सगळे करायचे आणि आम्ही मात्र राज्यात माशा मारत बसणार व दिलेले आरक्षण गमावून बसणार हे आणखी किती दिवस चालणार असा टोला फडणवीसांनी राज्य सरकारला लगावला होता. त्यावर नवाब मलिकांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. " देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाने माशा मारणे स्पर्धाही भरवावी!" असा शब्दात नवाब मलिक यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

(CoronaVirus : टास्क फोर्स राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधणार, मुख्यमंत्रीही मार्गदर्शन करणार!)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. परंतु, महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, घटनेच्या कलम १०२ मध्ये दुरुस्ती केल्यानंतर केंद्र सरकारने हे स्पष्ट केले होते की, कुठल्याही समाजाला मागास घोषित करण्याचा अधिकार राज्याकडेच राहील; परंतु सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात यासंदर्भात एकमत झाले नाही.

औकातीत राहा... मानसिक उपचार घ्या...
'सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भांडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे. प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत.  नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे असा टोला मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला.

Web Title: BJP Leader Keshav Upadhye slam to NCP leader Nawab Malik and Maha Vikas Aghadi Government Over tweets against Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.