शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

“दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की अजूनही वर्क फ्रॉम?”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 2:37 PM

ठाकरे सरकारने लोकल प्रवाससचा प्रश्न अवघड करून ठेवला आहे, अशी टीका केल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देदोन डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाहीभाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून साधला निशाणा

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारवर भाजप तसेच जनतेचा रेटा सुरू होता. यानंतर ठाकरे सरकारने सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टनंतर लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देत असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, यासाठी काही अटी सरकारने ठेवल्या आहेत, त्या पूर्ण केल्यानंतर लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र, ठाकरे सरकारने लोकल प्रवाससचा प्रश्न अवघड करून ठेवला आहे, अशी टीका केल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार का, अशी विचारणा केली आहे. (bjp keshav upadhye taunts cm uddhav thackeray about doing work from home)

“हा टाइमपास कशाला?”; संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन घेणाऱ्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. नागरिकांच्या रोषामुळे महाविकास आघाडी सरकार नमले. भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, अशी टीका केल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

PM मोदींची UNSC मध्ये पंचसुत्री; रशियाने मानले भारताचे आभार, व्लादिमीर पुतिन म्हणाले...

दोन डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?

दोन डोस घेतलेले सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील पण दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तसही तुम्ही स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वत:ही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम करणार, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

कोर्टात याचिका करायची की आंदोलन हे ही सांगा

याआधी, आंदोलनं, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो, आपलं अभिनंदन. आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू की आंदोलन? हेही सांगा, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला होता. 

आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!

दरम्यान, कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले.    

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाState Governmentराज्य सरकारShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण