शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

"ठाकरे सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालविला" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 11:52 IST

BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray : भाजपाने (BJP) बारावीच्या निकालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या निकालाची प्रक्रिया सुरू असून, अद्याप राज्य मंडळाने निकालाची अधिकृत तारीख प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे निकालाबाबत पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे. याच दरम्यान भाजपाने (BJP) बारावीच्या निकालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "ठाकरे सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालविला" असं म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपण किती उदासीन आहोत हेच दाखवून दिले" असं देखील म्हटलं आहे. "ठाकरे सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाचे तमा ना १२ वीच्या विद्यार्थ्यांची काळजी. सर्वोच्च न्यायालयाने 12वी परीक्षेचा निकाल ३१ जुलैला जाहीर करा असे स्पष्ट केलं होतं. मात्र ते जाहीर न करून सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालविला आहे" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिलेली ३१ जुलैची मुदत पाळण्यासाठी आघाडी सरकारने लक्ष केंद्रीत करायला हवे होते. मात्र निकालासाठीची मुदत न पाळून महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपण किती उदासीन आहोत हेच दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात अजून स्पष्टीकरणही दिलेले नाही, हे आणखी धक्कादायक आहे" असं देखील उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 

बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. आता विभागीय मंडळाकडून प्राप्त गुणांचे संकलन राज्य मंडळकडून केले जात आहे. मंडळाकडून ३१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी विद्यार्थी व पालकांना अपेक्षा होती. परंतु, निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात बारावीचा निकाल येत्या ७ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल,अशी अफवा विद्यार्थी व पालकांमध्ये परसली आहे. परंतु,या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHSC Exam Resultबारावी निकालPoliticsराजकारणStudentविद्यार्थीVarsha Gaikwadवर्षा गायकवाड