शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

"स्वत:च्या आमदार, मंत्र्यांची सरकारला भीती; उघडं पडण्याच्या भीतीनं सरकार पळ काढतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 19:15 IST

BJP Devendra Fadnavis And Thackeray Government : देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान भाजपा नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. विविध मुद्द्यांवरून फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून  पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच "मंत्री 10 हजार लोकं जमवतात आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते" असं म्हणत फडणवीसांनी सणसणीत टोला लगावला आहे. 

जनतेच्या प्रश्नावर सरकारला काही देणं घेणं नाही. बिझनेस अ‍ॅडव्हायझरी कमिटीवरुन वॉकआऊट करत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. संजय राठोड प्रकरणासह इतरही प्रकरणांमध्ये विरोधी पक्ष नेहमीच आक्रमक राहील असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. अशा प्रकरणात उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसेच नियम फक्त विरोधकांनाच आहेत का?, सत्ताधाऱ्यांना नाहीत का? असा सवाल करत टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात विविध प्रकारचे प्रश्न आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते"

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि परिस्थिती ठीक झाल्यानंतर पूर्ण अधिवेशन घ्या अशीही मागणी केली आहे. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. अधिवेशनापासून पळ काढणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झालं नाही. कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? इथेच येताना भीती का वाटते? असा सवालही फडणवीसांनी  केला आहे. कोरोनाच्या नावाने पळ काढला जात आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 

"जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणं घेणं नाही"

"विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलं आहे. निवडणुकीत काही वेगळं चित्र निर्माण होईल का? अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही" असं फडणवीसांनी म्हटलं आहे. "जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणं घेणं नाही. अधिवेशनात जेवढा कालावधी मिळेल त्या कालावधीत सर्व आयुधांचा वापर करुन जनतेचे प्रश्न मांडू आणि सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू" असं देखील म्हटलं आहे. सरकार अधिवेशनाचा कालावधी पहिला आठवडा, दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि दोन दिवस चर्चा असा ठरल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाSanjay Rathodसंजय राठोडMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना