शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 19:21 IST

Bihar Election Result 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला असून कोण जिंकणार, कोण हरणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

अकोला : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला असून कोण जिंकणार, कोण हरणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यातच काल एक्झिट पोल आलेले असताना महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. बिहारमध्ये त्यांची आघाडी 20 ते 22 जागा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

बिहार निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटमुळे बिहारची निवडणूक विकासाच्या मुद्यावर आली, हे आमचे यश असून आम्ही २० ते २२ जागांवर यश मिळवू, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यामध्ये शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

आळंदीच्या वैदिक आचार्यांच्या दबावामुळेच मंदिर बंदराज्यभरातील वारकऱ्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी करून वंचित बहुजन आघाडीला या आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. त्यानुसार पंढरपुरात आंदोलन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात निर्णय देतो, असे जाहीर केले होते; मात्र आळंदीच्या वैदिक आचार्यांच्या दबावापुढे शासन झुकले. राज्यभरातील मंडळींना मंदिर खुले करण्याचे श्रेय जाईल, अशी भीती त्यांना वाटली. त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरुध्द बनकर असे दोन उमेदवार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. भिंगे, बनकर हे राजकीय प्रलोभनाला बळी पडले असून, या दोघांचेही राजकारण शॉर्ट टाइम टर्मचे आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला भाडोत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टोला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस