शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

"मी सरकारमध्ये असतो तर शेतकऱ्यांशी चर्चा केली असती, त्वरीत कायदा रद्द केला असता"     

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:05 IST

Amarinder Singh Over Farmers Protest : केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि तिन्ही कायद्यांमधील सुधारणा रद्द कराव्यात असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत बंदमध्ये संपूर्ण देशभरातील शेतकर्‍यांनी एकता दाखवली आहे. यामुळे केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि तिन्ही कायद्यांमधील सुधारणा रद्द कराव्यात असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

अमरिंदर सिंग यांनी "देशातील सर्व शेतकरी या विषयावर एकत्रित असून त्यामध्ये बदल करण्याची मागणी करत असताना केंद्र सरकार मात्र शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का करतंय? सरकारने या मुद्द्याशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे. मी सरकारमध्ये असतो तर कुठलाही उशीर न करता शेतकऱ्यांशी चर्चा केली असती आणि आपल्या चुका स्वीकारून कायद्यातील तिन्ही सुधारणा त्वरीत काढून टाकल्या असत्या" असं म्हटलं आहे. 

"जुन्या कायद्यापासून शेतकऱ्यांना दूर का ठेवलं जातंय?"

केंद्र सरकारने बाजार समिती व्यवस्था काढून टाकण्याऐवजी सुरू ठेवायला हवी होती. कारण शेतकऱ्यांनाही तेच हवं आहे. जुन्या कायद्यापासून शेतकऱ्यांना दूर का ठेवलं जातंय. ते कायदे सुरूच ठेवले पाहिजेत. शेतकऱ्यांकडील कृषी माल खरेदी करण्यासाठी खासगी संस्थांना कोणीही अडवत नाही. मात्र दशकांपासून चालू असलेल्या कायद्याने शेतकऱ्यांसाठी फायदा होत आहे आणि त्यांना तो चांगल्याप्रकारे समजला आहे. यामुळे तो काढून टाकणं योग्य नाही असं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रुपाणी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. "राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक माहिती आहे का?" असा सवाल विचारला आहे. 

"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"

मेहसाणा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना विजय रूपाणी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस ज्या सुधारणांची वकीली करायची आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच "मी राहुल गांधींना विचारु इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?" असं रूपाणी यांनी निशाणा साधला आहे. रूपाणी हे मेहसाणा येथे 287 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले नर्मदा पेयजल योजनेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

टॅग्स :PunjabपंजाबFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीIndiaभारत