शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

"केंद्र सरकार निर्दयी आणि पाषाणहृदयी, त्यांना अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:14 IST

Aslam Sheikh Criticize Central Government : एका बाजूला समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.

मुंबई - एका बाजूला समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसू नयेत, एवढं निर्दयी व पाषाणहृदयी केंद्र सरकार आहे.काल सायंकाळी रॅलीमध्ये मालाड-मालवणीच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोदी सरकारचा अस्त आता समीप आला आहे, असा घणाघात मुंबई शहरचे पालकमंत्री व काॅंग्रेस नेते अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर केला आहे. काल सायंकाळी  इंधन दरवाढी विरोधात मालाड-मालवणी येथे आयोजित भव्य पदयात्रेनंतरच्या सभेत ते बोलत होते. 

दिवसागणिक वाढत चाललेली महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भीडणारे भाव, अतिदक्षता विभागात दाखल झालेला जीडीपी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कृषी कायद्याबाबत जाब विचारण्यासाठी काॅंग्रेस मालाड (प.) विधानसभा क्षेत्राच्यावतीने मंगळवारी पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले होते.  मालवणी-अंबोजवाडी येथे या पदयात्रेचे रुपांतर मोठ्या सभेत झाले. 

यावेळी अस्लम शेख व मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप  यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. काॅंग्रेसचे हजारो कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी होत मोदी सरकार विरोधातल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेविरोधात निकराचा लढा काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता. आज त्याच प्रकारचा संघर्ष काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिप्रेत आहे, असे आवाहन शेख यांनी भाषणाच्या शेवटी काॅंग्रेस कार्यकर्त्यांना केले. 

काॅंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकविणारा शेतकरी मोदी सरकारला त्याच मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत देशाला सांप्रदायिक शक्तींपासून काॅंग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारच वाचवू शकतात असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काॅंग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, काॅंग्रेसचे युवा नेते हैदर शेख, नगरसेविका कमरजहाॅं सिद्दकी, नगरसेवक विरेंद्र चौधरी, डाॅ. नॅक्सन नाटके, धनाजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

 मंगलप्रभात लोढा यांचा घेतला समाचार अस्लम शेख यांनी भाषणात  भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष लोढा यांनी मालवणी परिसराचा दौरा करुन मालवणीत  हिंदू व दलितांवरती अत्याचार होत आहेत असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की,  सर्व जाती-धर्मांचे लोक या मालवणीेत गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदाने नांदत आहेत. ही मालवणी म्हणजे हिंदुस्थान आहे. पण काही मालवणीत येऊन येथील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत आहेत,अशा लोकांना कायद्याच्या भाषेत उत्तर द्यायला आपण सक्षम असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

टॅग्स :MumbaiमुंबईPoliticsराजकारणcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार