शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अमोल कोल्हेंना पाडणार : राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची बॅनरबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 13:49 IST

शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेले आणि नुकतेच शिरूर लोकसभेचे तिकीट जाहीर झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे :शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेले आणि नुकतेच शिरूर लोकसभेचे तिकीट जाहीर झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातल्या एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने 'अमोल कोल्हे यांना पाडणार' अशा अर्थाची बॅनरबाजी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. 

 २०१४साली शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अपयश आले होते. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी केली होती. दुसरीकडे कोल्हे यांना अपॆक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे. तीन वेळा प्रयत्न करूनही धोका दिलेली शिरूरची जागा काहीही करून मिळवायची असा चंग राष्ट्रवादीने बांधला असताना मात्र कोल्हे यांना कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

सागर डुंबरे नावाच्या या बॅनरमध्ये लिहिताना ''अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार असतील तर त्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार, अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या लांडे यांना उमेदवारी न दिल्याने कोल्हे यांना पाडण्याची भाषाही या बॅनरमध्ये केली आहे''. निवडणूक तोंडावर आलेली असताना कार्यकर्त्यांची नाराजी कोल्हे यांना परवडण्यासारखी नाही. त्यामुळे आता यावर कोल्हे आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया होते हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShirurशिरुर