शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Video: ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात?

By प्रविण मरगळे | Updated: February 18, 2021 13:49 IST

Farmer Allegation against Shiv Sena Minister Shankarrao Gadakh: दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहेशंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही

मुंबई – एकीकडे देशभरात कृषी कायद्यावरून गेल्या ३ महिन्यापासून शेतकरी(Farmers) आंदोलन पेटलं आहे, कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलनाला बसले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ संजय राऊत(Shivsena Sanjay Raut)यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे गेले होते, शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचं तरूण शेतकऱ्याने म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख(Shankarrao Gadakh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकऱ्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचं ठरवलं आहे, इतकचं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली नाही तर ऊसात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दुष्काळातून होरपळलेलो असताना सरकारी मदत झाली नाही, कष्टाने ऊस पिकवला तरी दीड वर्ष झाली ऊसाला तोड नाही असा आरोप या तरूण शेतकऱ्याने केला आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही, त्या मंत्र्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली आहे, शंकरराव गडाख हे शेतकऱ्यांना टार्गेट करतात. तुम्ही दिलेल्या मंत्रिपदाचा दुरूपयोग केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावं असं ऋषिकेश शेटे या तरूण शेतकऱ्याने सांगितले आहे.

अलीकडेच ग्रामपंचायत निवडणुका गावात पार पडल्या, शंकरराव गडाख यांच्या कारखान्यात भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात पॅनेल केला. जलसंधारण मंत्र्याच्या मतदारसंघात ही अवस्था आहे, या मुद्द्यावर गावात पाणी, रस्ते मिळावे यासाठी निवडणुकीत पॅनेल उभं केलं, त्यामुळे शंकरराव  गडाख यांनी ऊसाला तोड येऊ दिली नाही. ऊसाला तोड न आल्याने ऊस पूर्णपणे वाकला आहे. शंकरराव गडाख यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची अशाप्रकारे पिळवणूक केली जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केला, मुळा सहकारी साखर कारखाना हा शंकरराव गडाख यांच्या अख्यारित आहे. त्यामुळे एकीकडे देशातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

टॅग्स :FarmerशेतकरीShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmers Protestशेतकरी आंदोलनShankarrao Gadakhशंकरराव गडाख