शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Video: ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात?

By प्रविण मरगळे | Updated: February 18, 2021 13:49 IST

Farmer Allegation against Shiv Sena Minister Shankarrao Gadakh: दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहेशंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही

मुंबई – एकीकडे देशभरात कृषी कायद्यावरून गेल्या ३ महिन्यापासून शेतकरी(Farmers) आंदोलन पेटलं आहे, कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलनाला बसले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ संजय राऊत(Shivsena Sanjay Raut)यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे गेले होते, शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचं तरूण शेतकऱ्याने म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख(Shankarrao Gadakh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकऱ्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचं ठरवलं आहे, इतकचं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली नाही तर ऊसात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दुष्काळातून होरपळलेलो असताना सरकारी मदत झाली नाही, कष्टाने ऊस पिकवला तरी दीड वर्ष झाली ऊसाला तोड नाही असा आरोप या तरूण शेतकऱ्याने केला आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही, त्या मंत्र्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली आहे, शंकरराव गडाख हे शेतकऱ्यांना टार्गेट करतात. तुम्ही दिलेल्या मंत्रिपदाचा दुरूपयोग केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावं असं ऋषिकेश शेटे या तरूण शेतकऱ्याने सांगितले आहे.

अलीकडेच ग्रामपंचायत निवडणुका गावात पार पडल्या, शंकरराव गडाख यांच्या कारखान्यात भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात पॅनेल केला. जलसंधारण मंत्र्याच्या मतदारसंघात ही अवस्था आहे, या मुद्द्यावर गावात पाणी, रस्ते मिळावे यासाठी निवडणुकीत पॅनेल उभं केलं, त्यामुळे शंकरराव  गडाख यांनी ऊसाला तोड येऊ दिली नाही. ऊसाला तोड न आल्याने ऊस पूर्णपणे वाकला आहे. शंकरराव गडाख यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची अशाप्रकारे पिळवणूक केली जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केला, मुळा सहकारी साखर कारखाना हा शंकरराव गडाख यांच्या अख्यारित आहे. त्यामुळे एकीकडे देशातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

टॅग्स :FarmerशेतकरीShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmers Protestशेतकरी आंदोलनShankarrao Gadakhशंकरराव गडाख