शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
3
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
4
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
5
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!
6
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
7
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
8
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
9
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
10
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
11
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
12
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
13
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
14
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
15
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
16
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
17
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
18
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
19
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
20
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड

Video: ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात?

By प्रविण मरगळे | Updated: February 18, 2021 13:49 IST

Farmer Allegation against Shiv Sena Minister Shankarrao Gadakh: दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहेशंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही

मुंबई – एकीकडे देशभरात कृषी कायद्यावरून गेल्या ३ महिन्यापासून शेतकरी(Farmers) आंदोलन पेटलं आहे, कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलनाला बसले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ संजय राऊत(Shivsena Sanjay Raut)यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे गेले होते, शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचं तरूण शेतकऱ्याने म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख(Shankarrao Gadakh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकऱ्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचं ठरवलं आहे, इतकचं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली नाही तर ऊसात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दुष्काळातून होरपळलेलो असताना सरकारी मदत झाली नाही, कष्टाने ऊस पिकवला तरी दीड वर्ष झाली ऊसाला तोड नाही असा आरोप या तरूण शेतकऱ्याने केला आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही, त्या मंत्र्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली आहे, शंकरराव गडाख हे शेतकऱ्यांना टार्गेट करतात. तुम्ही दिलेल्या मंत्रिपदाचा दुरूपयोग केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावं असं ऋषिकेश शेटे या तरूण शेतकऱ्याने सांगितले आहे.

अलीकडेच ग्रामपंचायत निवडणुका गावात पार पडल्या, शंकरराव गडाख यांच्या कारखान्यात भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात पॅनेल केला. जलसंधारण मंत्र्याच्या मतदारसंघात ही अवस्था आहे, या मुद्द्यावर गावात पाणी, रस्ते मिळावे यासाठी निवडणुकीत पॅनेल उभं केलं, त्यामुळे शंकरराव  गडाख यांनी ऊसाला तोड येऊ दिली नाही. ऊसाला तोड न आल्याने ऊस पूर्णपणे वाकला आहे. शंकरराव गडाख यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची अशाप्रकारे पिळवणूक केली जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केला, मुळा सहकारी साखर कारखाना हा शंकरराव गडाख यांच्या अख्यारित आहे. त्यामुळे एकीकडे देशातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

टॅग्स :FarmerशेतकरीShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmers Protestशेतकरी आंदोलनShankarrao Gadakhशंकरराव गडाख