शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले, “हिंमत असेल तर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले

By प्रविण मरगळे | Updated: February 28, 2021 21:44 IST

Ajit Pawar Challenge to BJP to Bring No Cofidence motion in Assembly: काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नाहीयंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे.सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे, अधिवेशनात विरोधकांनी ठाकरे सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची रणनीती आखली आहे, यात धनंजय मुंडे, संजय राठोड, वाढीव वीज बिलसारखे अनेक प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, यातच विधानसभा अध्यक्षपदाचाही विषयावरूनही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र आहे.(DY CM Ajit Pawar Open Challenge to BJP Devendra Fadnavis)  

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नसल्याने यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) सरकारवर टीका केली होती, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही रोखठोक उत्तर दिलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

फडणवीस म्हणाले की, सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दाच कार्यक्रम पत्रिकेत घेण्यात आला नाही, त्यावर पत्रकारांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा प्रश्न विचारला, तेव्हा अजितदादा म्हणाले की, जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणून दाखवावा, मग वाजवून दाखवतो, त्यांच्यासोबत किती आमदार आहेत आणि आमच्यासोबत किती...अजित पवारांच्या(Ajit Pawar) या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले.

संजय राठोड राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा

सरकार चालवताना न्यायाने वागावं ही आमची जबाबदारी आहे. तपास झालाच पाहिजे, परंतु गेल्या काही दिवसांत गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे, चौकशीत दोषी असेल तर कोणी कितीही मोठा असेल तर शिक्षा होणारच आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असेल असा न्याय नको, वर्षभरापासून आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, अशा घटना घडत आहेत असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.

..अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

तसेच प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, इतके दिवस का लावले असा विचार करत असाल तर ज्या क्षणी ही घटना घडली, तेव्हा आमच्या सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास कालबद्ध ठरवा आणि अहवाल द्या, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणालाही पाठिशी घालणार नाही, संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे, परंतु हे सगळं सुरू असताना आदळआपट करून तपास यंत्रणेवर दबाव टाकणं हे योग्य नाही, तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवला जातोय, महाराष्ट्र पोलिसांवर विरोधकांचा अविश्वास आहे. पोलीस यंत्रणांवर अविश्वास दाखवत असाल तर आपल्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे