शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

"अखिलेश सरकारने मला 12 वेळेस येण्यापासून रोखलं, 28 वेळा परवानगी नाकारली पण आता मी आलो आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 2:30 PM

Asaduddin Owaisi And Akhilesh Yadav : असदुद्दीन ओवैसी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा अखिलेश यादव यांचं सरकार होतं तेव्हा मला उत्तर प्रदेशमध्ये येण्यापासून 12 वेळेस रोखण्यात आलं होतं व 28 वेळा मला येण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आली होती, आता आलो आहे" असं म्हणत ओवैसी यांनी टोला लगावला आहे. तसेच सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्यासोबत युती केली आहे. मी मैत्री निभवण्यासाठी आलो आहे. आम्ही दोघं यूपीमध्ये टक्कर देऊ असं देखील ओवैसींनी म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसी वाराणसी विमानतळावर पोहचताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. तर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ओवैसी यांनी जेव्हा आम्ही कोणतीही निवडणूक लढवतो तेव्हा ती जिंकणं हाच आमचा उद्देश असतो असं देखील म्हटलं आहे. ओवैसा आणि राजभर आझमगड आणि मऊ येथील कार्यकर्त्यांसोबत बैठक करणार आहेत. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट देखील घेणार आहेत. आगामी निवडणुकांसाठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच"

"मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच" असं याआधी ओवैसी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भारतीय ट्रायबल पार्टी (Bhartiya Tribal party) आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोबत आले आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीटीपी आमदार छोटूभाई वसावा (Chotubhai Vasava) यांनी माहिती दिली. वसावा म्हणाले, बीटीपी आणि एआयएमाआयएम संविधान वाचविण्यासाठी एकत्रितपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. 

छोटू वसावा हे जहागडियाचे आमदार आहेत. ते म्हणाले, बीटीपी आणि AIMIM गुजरातमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत. तसेच चांगल्या भविष्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही हटविण्यासाठी जनतेला काम करावे लागेल. बीटीपीला राजस्थानमध्ये धोका मिळाला कारण तेथे बीटीपीला दूर ठेवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले होते, असेही ते म्हणाले. 

बीटीपीने राजस्थानातील राजकीय समीकरण बदलले 

असदुद्दीन ओवेसी यांनी राजस्थानत बीटीपीला पाठिंबा देण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला होता. तेव्हाच, ओवेसी राजस्थानातील राजकारणात उतरण्याच्या प्रयत्नात असल्याचा कयास लावला जात होता. ओवेसी यांनी एका ट्विटच्या माध्यमाने बीटीपीला समर्थन दर्शवले होते. बीटीपीने नुकतेच अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण