शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

प. बंगालनंतर आता ‘या’ राज्यातही भाजपाला सतावतेय बंडखोरीची चिंता; आमदार फुटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 3:14 PM

या समितीत आसाम, त्रिपुराचे भाजपा संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देही समिती भाजपा प्रदेशाध्यक्ष माणिक साहा आणि सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेणार आहे.महामारीच्या काळात भाजपा नेत्यांनी अधिक सक्रीय होणं गरजेचे आहे असं पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं.मुकुल रॉय ते नेते आहेत ज्यांनी २०१६ मध्ये ६ काँग्रेस नेत्यांना टीएमसीमध्ये आणलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला(BJP) धक्का दिल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस(TMC)नं त्रिपुरामध्येहीभाजपा बंडखोरांना पक्षात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. भाजपातील बंडखोरांना टीएमसीत घेण्याची जबाबदारी अलीकडेच भाजपातून आलेल्या मुकुल रॉय यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्षातील लोकांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महासचिव बीएल संतोष यांच्या नेतृत्वाखाली एक पथक संघटनात्मक बांधणीसाठी राज्यात पाठवलं आहे.

या समितीत आसाम, त्रिपुराचे भाजपा संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे. ही समिती भाजपा प्रदेशाध्यक्ष माणिक साहा आणि सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, कॅबिनेट सहकारी आणि खासदारांचीही बैठक घेणार आहेत. भाजपा प्रवक्ते नबेंद्रु भट्टाचार्य म्हणाले की, या बैठकींचा उद्दिष्ट संघटन मजबूत करणं आहे. महामारीच्या काळात भाजपा नेत्यांनी अधिक सक्रीय होणं गरजेचे आहे असं पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं.

तसेच त्रिपुराचे लोक जागरूक आहेत. ते बाहेरच्या पक्षांना थारा देणार नाहीत. मुळात या लोकांनी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं केलेला हिंसाचार पाहिला आहे. त्यामुळे टीएमसीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. केंद्रीय नेतृत्वाने पक्षातील नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम पक्षाचे नेतृत्व करत आहेत असं भट्टाचार्य म्हणाले. तर पक्षात कोणतेही मतभेद नाहीत सर्व ठीक आहे असं प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी सांगितले.

मुकुल रॉय मुरलेले राजकारणी

मुकुल रॉय ते नेते आहेत ज्यांनी २०१६ मध्ये ६ काँग्रेस नेत्यांना टीएमसीमध्ये आणलं होतं. तेव्हा काँग्रेसनं त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यानंतर मुकुल रॉय यांनीच त्या ६ आमदारांना भाजपात घेऊन गेले होते. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पुन्हा जिंकल्यानंतर टीएमसीनं घोषणा केली होती की, भाजपाला आव्हान देण्यासाठी आगामी काळात पक्षाचा विस्तार बाहेरच्या राज्यातही केला जाईल.

मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यावर आमदार नाराज

 त्रिपुरा भाजपातील काही आमदार मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यावर नाराज होते. मागील ऑक्टोबरमध्ये हे आमदार दिल्लीत गेले होते. आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा आणि बीएल संतोष यांची भेट घेतली. मुख्यमंत्री बिप्लब देब यांना हटवण्याची मागणी या आमदारांनी केली होती. यातील बहुतांश आमदार हे काँग्रेस आणि टीएमसीतून आलेले आहेत. २०१८ मध्ये हे भाजपात सहभागी झाले. त्यामुळे विचारधारा, पक्ष आणि तत्त्व या आमदारांसाठी नगण्य आहे. दुसऱ्या पक्षांना हे आमदार फोडणं सहज शक्य आहे.  

 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालTripuraत्रिपुरा