शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

बीड, अहमदनगरनंतर भाजपाला मुंबईतही फटका; राजधानीत मुंडे समर्थकाचा पहिलाच राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 21:55 IST

बीड, अहमदनगर येथून अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देप्रीतमताईला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी वा ती नाराज नाही. अन्यायाची भावना ही समर्थकांमध्ये असते.प्रीतम यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होते. हीना गावित यांचेही होते. प्रीतमचे नाव योग्यच होतेदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या विस्तारासाठी आपलं आयुष्य खर्ची केले

मुंबई – केंद्रीय कॅबिनेट विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यातच पंकजा मुंडे मंगळवारी नाराज कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक घेणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सगळ्यांचेच लक्ष पंकजा मुंडे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. कॅबिनेट विस्तारात डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आल्यानं मुंडे समर्थक नाराज आहेत. बीड, अहमदनगर येथून अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.

आता राजधानी मुंबईतही मुंडे समर्थकाने राजीनामा दिला आहे. भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी राजीनामा दिला आहे. डमाळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रीतमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईलअशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात आलं. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या विस्तारासाठी आपलं आयुष्य खर्ची केले असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत तोच वारसा घेऊन पंकजाताई आणि प्रीतमताई दिवसरात्र पक्षविस्तारासाठी मेहनत घेत आहेत. या दोन्ही मुंडे भगिनींकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सहन झालं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मी चिटणीसपदाचा राजीनामा देत आहे असल्याचं डमाळे यांनी पत्रात म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

प्रीतमताईला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी वा ती नाराज नाही. अन्यायाची भावना ही समर्थकांमध्ये असते. लोकांच्या भावना बदलणे हे माझे काम नाही, ते काळानुसार होत राहील.  जनता त्यांच्या प्रेमातून नेतृत्वाची उंची तयार करते. आमचं फक्त नाव नाही, वारसा आहे, कर्तृत्व, वक्तृत्वही आहे. प्रीतम यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होते. हीना गावित यांचेही होते. प्रीतमचे नाव योग्यच होते. मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही तर ती कष्टाळू, हुशार आहे, बहुजन चेहरा आहे या शब्दात पंकजा यांनी बहिणीचे कौतुक केले.

भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. जे प्रमुख व्यक्ती आहेत ते ठरवतात. अनेकांची नावे चर्चेत होती, ती न येता नवीन नावे आली. पक्षश्रेष्ठींनी नवनवीन लोकांना संधी दिली. त्यांच्यात गुण असल्याचे पक्षाला जाणवले असेल व त्यांचा फायदा पक्षाला किती झाला हे भविष्यात कळेल, असे मतही पंकजा यांनी व्यक्त केले.

पंकजा मुंडेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक घेतली. यात ११ सचिवांच्या सोशल मीडियाचा रिपोर्ट पंतप्रधान मोदींच्या हातात होता. यात २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले. कोणत्या सचिवांनी राष्ट्रीय मुद्द्यावरून मतप्रदर्शन केले याची माहिती पंतप्रधानांकडे होती. पकंजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत पकंजा तुम्ही जास्त बोलता, लोकल मुद्द्यांवर खूप बोलता पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत.

लोकलपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्या असा सल्ला मोदींनी पंकजा मुंडेंना दिला. तसेच बीड जिल्ह्यातील एका मुस्लीम व्यक्तीनं गोशाळा बांधलीय, त्यांना केंद्राने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. या पद्मश्रींना तुम्ही जाऊन भेटला का? असा सवाल पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. लोकांशी नाळ तोडू नका असा सल्ला त्यांनी पंकजा यांना दिला.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीBeedबीड