शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

"मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका; भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार" 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 7:34 PM

भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार माघारी परतणार असल्याचा तृणमूलच्या मंत्र्याचा दावा

कोलकाता: विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेससमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता तृणमूलनं भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीपश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतलं. भाजपच्या या राजकारणाला तृणमूलनं त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील, असा दावा तृणमूलचे नेते आणि पश्चिम बंगालचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी केला.स्वामी विवेकानंद यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभादरम्यान मलिक यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल विचारलं असता, ते तिथे का गेले ते मलादेखील माहीत नाही. ते भाजपमध्ये ४-५ महिने राहतील का, असा प्रश्न मला पडला आहे. कदाचित त्यांचं काम झाल्यावर ते पक्ष सोडतील, असं मलिक म्हणाले.पुढील काही महिन्यांत भाजपमध्ये एकही व्यक्ती दिसणार नाही. लवकरच ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल. यामध्ये तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्यांचादेखील समावेश आहे. तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. ही मंडळी लवकरच स्वगृही परततील, असा दावा मलिक यांनी केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहा