शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या भूमिकेमुळे तृतीयपंथींचे स्वप्न भंगणार? पोलीस भरतीसाठी धोरण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 19:32 IST

आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी पोलीस भरतीमध्ये नोकरीची संधी द्यावी

पिंपरी : राज्यात पोलीस भरती होत असून, त्यात तृतीयपंथींनाही सामावून घ्यावे. त्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज सादर करण्यासाठी रकाना (काॅलम) उपलब्ध करून द्यावा, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी दिला होता. मात्र, याप्रकरणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस भरतीसाठी तृतीयपंथींबाबत धोरण केलेले नाही, असे म्हणत सरकारने तृतीयपंथींना पोलीस भरतीमध्ये सामावून घेण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस होण्याचे तृतीयपंथींचे स्वप्न भंगणार का, असा प्रश्न तृतीयपंथींकडून उपस्थित केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरी करून काही तृतीयपंथी सध्या सन्मानाचे जीवन जगत आहेत. यातील काही तृतीयपंथी हे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, राज्यात पोलीस दलाच्या भरतीत अर्ज करताना त्यांना तृतीयपंथी म्हणून रकाना (काॅलम) दिला गेलेला नसल्याने त्यांना नोकरीसाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे तृतीयपंथी असलेल्या निकिती मुख्यदल यांनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे. 

निकिता मुख्यदल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत तृतीयपंथींची व्यथा ऐकविली. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथींना संधी देण्याची मागणी केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर मुख्यदल यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. तृतीयपंथींसाठी पोलीस भरतीत जागा ठेवा, असे ‘मॅट’ने सांगितले. तरीही भरतीमध्ये तृतीयपंथींसाठी जागा ठेवण्यात आली नाही. 

‘राष्ट्रवादी’ही न्यायालयात धाव घेणार

तृतीयपंथींना पोलीस भरतीमध्ये संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात आली. पिंपरी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,  कविता आल्हाट, कविता खराडे, इम्रान शेख, विनायक रणसुंभे, दत्तात्रय जगताप उपस्थित होते. राज्य सराकरने तृतीयपंथींबाबत योग्य धोरण आखावे. त्यांचे अधिकार त्यांना द्यावेत. जर पोलीस भरतीत तृतीयपंथींना संधी मिळाली नाही तर न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असे अजित गव्हाणे यांनी यावेळी सांगितले.  

आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी पोलीस भरतीमध्ये नोकरीची संधी द्यावी

देशात काही तृतीयपंथी सनदी अधिकारी, आयपीएस अधिकारी, पोलीस निरिक्षक, पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातच तृतीयपंथींना असंवेदनशिल वागणूक का? आम्ही काय फक्त रस्त्यावर, सिग्नलला भिक मागायची का?  सरकारने आमच्याकडे माणूस म्हणून पहावे. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी पोलीस भरतीमध्ये नोकरीची संधी द्यावी. - निकिता मुख्यदल, तृतीयपंथी, पिंपरी

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransgenderट्रान्सजेंडरSocialसामाजिकexamपरीक्षाEducationशिक्षण