शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

पवना धरण परिसरात पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:47 IST

दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव : प्रशासनाची टोलवाटोलवी

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गेल्या आठवड्यात बोट पलटी होऊन दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक धरणात उतरतात, परंतु खोलीचा अंदाज न आल्याने बुडतात. काही जण बोटीतून पाण्यात फिरण्याची मजा लुटत असतात. मात्र बोटमालक कोणतीही सुरक्षा न देता बोटी पाण्यात फिरवतात. त्यामुळे वाऱ्याच्या व लाटेच्या तडाख्यात बोट बुडाल्याच्या घटनाही घडत आहेत.पवना धरण परिसरात २०२२ ते २०२४ दरम्यान ११ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पाच विनाइंधन नौकांना परवानगी आहे, मात्र सुमारे १५ ते २० इंधन बोटी आणि सुमारे ६० ते ७० विनाइंधन नौका बेकायदेशीरपणे धरणाच्या पाण्यात फिरताना दिसतात. यावर जलसंपदा विभागाचे अधिकारी गप्प आहेत. धरणामध्ये इंधन बोटीला परवानगी नसताना त्या राजरोस फिरत आहेत. धरणाच्या जागेवर अतिक्रमण करून बंगलेधरण परिसरात संपादित जागेवर अनेक धनदांडग्यांनी बेकायदेशीरपणे टोलेजंग बंगले व फार्महाऊस बांधले आहेत. काही जण महिन्यातून किंवा वर्षातून एकदा वास्तव्यासाठी येत असतात. इतर वेळी हे फार्महाऊस व बंगले महिन्याकाठी काही रक्कम ठरवून भाडेतत्त्वावर दिले जात आहेत. विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडे माहिती नाही. पर्यटकांची माहिती पोलिसांना न कळवता बंगले व फार्महाऊस भाड्याने दिले जातात.पोलिसांची कारवाई घटना घडल्यावरचधरण परिसरातील बंगले व फार्महाऊसवर पर्यटक भाडे देऊन राहण्यासाठी येत असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी काही जण अमली पदार्थ, दारू, मावा यांची राजरोस विक्री करतात. यामधून एखादी दुर्घटना घडली तरच पोलिस कारवाईचे कागदी घोडे पुढे करत असतात. सुरक्षारक्षक करतात काय?परिसरात सुमारे २२ सुरक्षारक्षक आहेत. गेल्या वर्षभरात जलसंपदा विभागाने नवीन सुरक्षारक्षक घेतले असून त्यांच्यासमोर राजरोस चालणाऱ्या उद्योगांकडे दुर्लक्ष होत आहे. 

डिसेंबर महिना सुरू झाला की धरण परिसरात पर्यटक येत असतात. परिसरात अनधिकृत बोटिंग मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे जॅकेट अथवा कोणत्याही सुरक्षा उपाययोजना नसतात. त्यामुळेच धरणात दरवर्षी पर्यटकांचा बुडून मृत्यू होत असतो. बोटमालकांनी पर्यटकांना सर्व सुविधा पुरवून बोट क्लब चालवावेत, नाही तर बंद करावेत. - नीलेश गराडे, संस्थापक, वन्यजीव रक्षक, मावळजलसंपदा विभाग अथवा पोलिसांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. घटना घडल्यानंतर फक्त पंधरा दिवस कठोर नियम लावले जातात. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. - दत्तात्रय काजळे, माहिती अधिकार कार्यकर्ते बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बोटी व नौका यामधील आठ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले असून, जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. बेकायदेशीर बोटी व नौकाचालकांची नावे द्या, कारवाई करू. - किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक, लोणावळा बेकायदेशीर व्यवसायांवर आमच्या विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ता जप्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी असल्याने ते दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी. - श्वेता कुराडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी