शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; १३ वर्षीय मुलानं वाचवले दोघांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 20:57 IST

दोन सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले आहे, मात्र त्यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले

पिंपरी : पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी एकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. एका १३ वर्षीय मुलाने तीन मुलांचे प्राण वाचविले. यातील दोन सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सद्‌गुरूनगर, भोसरी येथे सोमवारी (दि. २७) दुपारी ही घटना घडली.

सूरज अजय वर्मा (वय १२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), ओमकार प्रकाश शेवाळे (वय १३), अशी मृत्यू झालेल्या दोन मुलांची नावे आहेत. संदीप भावना डवरी (वय १२),, ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय १४) या मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले. यातील ओमकार आणि ऋतुराज हे दोन्ही सख्खे भाऊ होते. आयुष गणेश तापकीर या १३ वर्षीय मुलाने बुडत असलेल्या दोघांना वाचविले.

भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्‌गुरूनगर, भोसरी येथे जुन्या कचरा डेपोजवळ तलाव आहे. त्या तलावाजवळ १२ ते १५ वयोगटातील चार मुले खेळत असताना ते पोहण्यासाठी तलावात गेले. त्यावेळी पोहताना मुले बुडू लागली.

दरम्यान, आयुष तापकीर हा मुलगा म्हैस चारायला तलावाजवळ गेला होता. त्यावेळी मुले तलावात बुडत असल्याचे आयुष याच्या निदर्शनास आले. मुलांना वाचविण्यासाठी आयुष याने तलावाच्या दिशेने धाव घेतली. संदीप, ओमकार आणि ऋतूराज या तिघांना आयुष तापकीर याने पाण्याबाहेर काढले. मात्र सूरज तलावात बुडाला. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील ओमकार आणि ऋतुराज या दोन्ही सख्ख्या भावांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ओमकार याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सूरज याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

आयुष तापकीर याने तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील ओमकार याची प्रकृती गंभीर होती. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर संदीप डवरी व ऋतुराज शेवाळे यांना वाचविण्यात आयुष याला यश आले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातWaterपाणीDeathमृत्यू