शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:59 IST

आई अपघातात गंभीर जखमी झाली असून, आजी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे, घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे

कामशेत : कुलदैवताच्या दर्शनासाठी मावळातील नाणेगावातून शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ३४ भाविक खासगी ट्रॅव्हल्सने मार्गस्थ झाले. परंतु, पंढरपूर रस्त्यावरील भटुंबरे गावाजवळ बसवर काळाने घाला घातला. त्यात दोघांचा मृत्यू, तर ३२ जण जखमी व १२ जण गंभीर आहेत. या अपघातात दहा वर्षांच्या मुलीने जीव गमावला असून, तिची आई गंभीर जखमी आहे. तर एका साठ वर्षीय आजीचा मृत्यू झाला आहे. लहान मुलगी आणि आजीच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

मावळ तालुक्यातील कामशेतकडून कोंडीवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८०० लोकसंख्येचे नाणे हे गाव. या गावातून भाविक कुलदैवत शिवगड खंडोबाच्या दर्शनासाठी जात असतात. नाणे ते पंढरपूर, शिवगड तेथून तुळजापूर, अक्कलकोट असा मार्ग असतो.

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नंदिनी ट्रॅव्हल्स या खासगी बसने गावामधील सुमारे ३४ भाविक कुलदैवताच्या दर्शनाला निघाले. पंढरपूर तासाभराच्या अंतरावर होते, तर बसमध्ये भक्तिगीते सुरू होती. सर्वांना देवदर्शनाची ओढ लागली होती. भल्या सकाळी सहाच्या सुमारास बस भटुंबरे गावाजवळ आली आणि बसवर काळाने घाला घातला. समोरून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. त्यात बिबाबाई सोपान म्हाळसकर (वय ६० वर्षे) व जान्हवी उर्फ धनश्री विठ्ठल म्हाळसकर (वय १० वर्षे) या दोघींचा जागीच मृत्यू झाला.

काय घडले, कसे घडले

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस पंढरपूरकडे जात असताना वाहनचालकाच्या मागील आसनावर बसलेल्या एका प्रवाशाला चालक वाहन व्यवस्थित चालवत नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब इतर प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिली. चालकाला गाडी काही काळ थांबवावी, अशी सूचना केली. मात्र, दीड तासाचा रस्ता शिल्लक असल्याने बसचालकाने वाहन थांबवले नाही आणि पुढे अपघात घडला.

नाणे गावावर शोककळा

कुलदैवताच्या दर्शनाला येथील भाविक जात असतात. जान्हवी उर्फ धनश्री विठ्ठल म्हाळसकर नाणेगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. आई वनिता यांच्याबरोबर ती दर्शनास चालली होती. अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे. धनश्रीच्या पश्चात वडील, दोन बहिणी, आजी, आजोबा व चुलते असा परिवार आहे. तर बिबाबाई म्हाळसकर यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन नाती असा परिवार आहे. रात्री निघालेले आपले नातेवाईक परत येणार नाहीत, याचा कोणीही विचार केला नव्हता. रविवारी दुपारी अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर अनेकांचे नातेवाईक पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली. सायंकाळी सातच्या सुमारास दोघींचे मृतदेह गावात आणले होते. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :PuneपुणेmavalमावळAccidentअपघातDeathमृत्यूWomenमहिलाSenior Citizenज्येष्ठ नागरिकPandharpurपंढरपूर