शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 2:27 AM

नागरिकांना करावी लागते भटकंती; महापालिकेचे दुर्लक्ष

रावेत : यंदा पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली असे बोलले जात होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी रावेतकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थितीरावेतच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये आहे.रावेत येथील गावठाण, प्राधिकरण सेक्टर २९, ३२ जाधव वस्ती, शिंदे वस्ती, भोंडवेनगर आदी परिसरासह पाणीपुरवठा होणाºया भागात पाणी कमी दाबाने आणि अपुºया प्रमाणात येत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे विघ्न ओढवले आहे. काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.रावेत परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत नियमितपणे सर्वांना पुरेल एवढे पाणी नळास येत होते; परंतु मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे.काही भागात पुरेसा, तर काही भागात अपुºया दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे.काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना दुरून पाणी आणावे लागत आहे. प्रभाग १६ मध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी व दररोजच्या वापरासाठी लागणारे पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही.गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वाल्हेकरवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने चालू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला, तर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.योग्य नियोजनाचा अभावपाणीपुरवठा ही तातडिक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.कमी दाबाने पाणीपुरवठारावेतच्या प्राधिकरण सेक्टर २९, ३२ मधील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्ध्या तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.रावेतसह प्रभागातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. पाणीपुरवठा तातडीची सेवा असताना अधिकारी त्यांचा फोन बंद ठेवतात. याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहे. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास शहराला रावेत येथून होणारा पाणीपुरवठा बंद करून पूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात येईल.- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवकमहापालिकेकडून शहरातील सर्वच भागांमध्ये नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. कमी किंवा अनियमित पाणीपुरवठा नाही. काही भागातील जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचे काम सुरू आहे. अशा जलवाहिन्यांमुळे गळती होते. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी. त्याबाबत महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात येतील.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई