शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:18 IST

‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी : पवना नदी तीरावर चिंचवड येथे महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव सुरू आहे. तर दुसरीकडे पवना नदी फेसाळली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने दखल घेतली आहे. दूषित पाण्याचे नमुने घेतले असून तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

किवळे ते दापोडी दरम्यान पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मंगळवारी दुपारी पवना नदी फेसाळली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सकाळीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने चिंचवड, थेरगाव, रावेत, वाल्हेकरवाडी परिसराची पाहणी केली.

प्रदूषण होण्याचे ठोस उत्तर सापडेना ?

वर्षभरात पवना नदी अनेकदा दूषित पाण्याने फेसाळली. पर्यावरणवादी संस्थांनी आवाज उठवला. त्यानंतर रावेत ते चिंचवड परिसरातील लॉन्ड्री व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतरही नदीचे पाणी फेसाळत आहे. नदीचे प्रदूषण नक्की कशाने होत आहे, याचे ठोस उत्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. त्यांनी केवळ प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

असा आहे अधिकाऱ्यांचा कयास

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदी फेसाळण्याचे कारण हे डिटर्जंट किंवा साबणाचे पाणी असल्याचे नमूद केले आहे. बंधाऱ्यामध्ये जोपर्यंत पाणी साचून असते तोपर्यंत फेस निर्माण होत नाही. मात्र, धरणातून पाणी सोडल्यानंतर पाणी वाहू लागते. बंधाऱ्यावरून उंचावरून पाणी पडल्यानंतर त्याचा फेस होतो, आजवरच्या तपासलेल्या पाण्यात साबणाचे अंश आढळले आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

पीएमआरडीए, एमआयडीसींना सूचना

प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, ग्रामपंचायतींना गावं, उपनगरांमध्ये तयार होणारे मैला सांडपाणी प्रक्रिया न करता सोडू नये, अशा सूचना केलेल्या आहेत. रावेत, किवळेमध्ये प्रक्रिया न केलेले पाणी थेट नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणात भर पडत आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 दुर्गंधीतही वाढ

थेरगाव बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून आहे. नदीत पाणी सोडल्यानंतर फेस आणि दुर्गंधी येते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात नागरिकांना त्रास होतो.

पवना नदी प्रदूषणाबाबत तक्रारी आल्यानंतर तातडीने आमचे पथक घटनास्थळी जाते, पाहणी करते. आज सकाळीही पथक चिंचवडला गेले होते. तेथे पाण्याचे नमुने घेतले. दोन ते तीन दिवसांत अहवाल येईल. फेस कशामुळे आला, याचे कारण समजेल. मात्र, आजवरच्या नमुन्यांच्या तपासणीत असा निष्कर्ष आहे की, पाण्यात डिटर्जंट, साबणाचे प्रमाण अधिक असल्याने फेस होत असावा. नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आम्ही संबंधित प्रशासनास केलेल्या आहेत. - मंचक जाधव, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणriverनदी