शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:18 IST

‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी : पवना नदी तीरावर चिंचवड येथे महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव सुरू आहे. तर दुसरीकडे पवना नदी फेसाळली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने दखल घेतली आहे. दूषित पाण्याचे नमुने घेतले असून तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

किवळे ते दापोडी दरम्यान पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मंगळवारी दुपारी पवना नदी फेसाळली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सकाळीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने चिंचवड, थेरगाव, रावेत, वाल्हेकरवाडी परिसराची पाहणी केली.

प्रदूषण होण्याचे ठोस उत्तर सापडेना ?

वर्षभरात पवना नदी अनेकदा दूषित पाण्याने फेसाळली. पर्यावरणवादी संस्थांनी आवाज उठवला. त्यानंतर रावेत ते चिंचवड परिसरातील लॉन्ड्री व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतरही नदीचे पाणी फेसाळत आहे. नदीचे प्रदूषण नक्की कशाने होत आहे, याचे ठोस उत्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. त्यांनी केवळ प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

असा आहे अधिकाऱ्यांचा कयास

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदी फेसाळण्याचे कारण हे डिटर्जंट किंवा साबणाचे पाणी असल्याचे नमूद केले आहे. बंधाऱ्यामध्ये जोपर्यंत पाणी साचून असते तोपर्यंत फेस निर्माण होत नाही. मात्र, धरणातून पाणी सोडल्यानंतर पाणी वाहू लागते. बंधाऱ्यावरून उंचावरून पाणी पडल्यानंतर त्याचा फेस होतो, आजवरच्या तपासलेल्या पाण्यात साबणाचे अंश आढळले आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

पीएमआरडीए, एमआयडीसींना सूचना

प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, ग्रामपंचायतींना गावं, उपनगरांमध्ये तयार होणारे मैला सांडपाणी प्रक्रिया न करता सोडू नये, अशा सूचना केलेल्या आहेत. रावेत, किवळेमध्ये प्रक्रिया न केलेले पाणी थेट नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणात भर पडत आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 दुर्गंधीतही वाढ

थेरगाव बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून आहे. नदीत पाणी सोडल्यानंतर फेस आणि दुर्गंधी येते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात नागरिकांना त्रास होतो.

पवना नदी प्रदूषणाबाबत तक्रारी आल्यानंतर तातडीने आमचे पथक घटनास्थळी जाते, पाहणी करते. आज सकाळीही पथक चिंचवडला गेले होते. तेथे पाण्याचे नमुने घेतले. दोन ते तीन दिवसांत अहवाल येईल. फेस कशामुळे आला, याचे कारण समजेल. मात्र, आजवरच्या नमुन्यांच्या तपासणीत असा निष्कर्ष आहे की, पाण्यात डिटर्जंट, साबणाचे प्रमाण अधिक असल्याने फेस होत असावा. नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आम्ही संबंधित प्रशासनास केलेल्या आहेत. - मंचक जाधव, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणriverनदी