शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

वायसीएमच्या आयसीयू विभागात गरीब रुग्णांसाठी मिळत नाहीत खाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 00:10 IST

रुग्णसेवा पुरविण्याबाबत उदासीनता : खासगी रुग्णालयात जाण्याचा डॉक्टर देतात सल्ला

पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. कधीतरी अपवादात्मक परिस्थितीत नव्हे, तर हे विदारक वास्तव नित्याचेच झाले आहे. आयसीयूसाठी रुग्णाच्या खाटेचे बुकिंग करून वायसीएममध्ये जागा उपलब्ध होईपर्यंत खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये रुग्णांना दाखल करण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. खासगी रुग्णालयाचा खर्च पेलण्याची आर्थिक कुवत नसलेल्या गरीब रुग्णांना या परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहावे लागत आहे.

या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कधीही रुग्णास न्या, खाटा उपलब्ध नाहीत, असेच उत्तर तेथील डॉक्टरांकडून मिळते. खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करा, आपल्याकडे जागा उपलब्ध होताच रुग्णास आणता येईल, असे वायसीएमचे डॉक्टर सांगतात. मंगळवारी दुपारी एकास हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला. रुग्णास वायसीएममध्ये नेले असता आयसीयूमध्ये जागा नाही, असे सांगण्यात आले. रुग्णाची प्रकृती बिकट असतानाही त्याच्यावर सर्वसाधारण वॉर्डातच उपचार करण्यात आले. रात्री त्यास आॅक्सिजनची गरज भासली, त्या वेळी थोडा वेळ त्यास अतिदक्षता विभागात नेऊन पुन्हा सर्वसाधारण वॉर्डात आणून ठेवले आहे. अद्याप त्याच्या कोणत्याही महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या नाहीत, अहवाल प्राप्त झालेले नाहीत. वायसीएममध्ये एका आयसीयूमध्ये १५, तर दुसऱ्या ठिकाणी १८ खाटा आहेत. नव्याने २५ खाटांच्या आयसीयूचे काम हाती घेतलेआहे.मात्र ते पूर्ण झालेले नाही. आयसीयू उपलब्ध नाही म्हणून रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ येऊ नये, याची महापालिका वैद्यकीय विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे. गरीब-गरजूंसाठीचे हे रुग्णालय त्यांच्यासाठी अत्यंत तातडीक वेळी उपयोगात आले नाही तर रुग्णालयाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

रुग्णांचे हाल : वायसीएममध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडामहापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने येथे पाण्याची सोय करावी, अशी मागणी नातेवाईक करीत आहेत. दररोज दहा लाख लिटर पाणीही अपुरे पडू लागले आहे. शहरातील महापालिकेचे वायसीएम रुग्णालय सर्वांत मोठे सात मजली आहे. येथे शहर व जिल्हाभरातून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची वर्दळ असते. अत्यंत कमी दरात येथे रुग्णांवर उपचार केले जातात.

खासगी रुग्णालयाच्या तुलनेत माफक दरात सर्व चाचण्या होत असल्याने बाह्य रुग्ण विभागातही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, रुग्णालयात पाण्याची टंचाई असल्याने नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांसोबतच येथे शेकडो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या आठवड्यापासून रुग्णालयात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाण्याचे नियोजन नसल्याने पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी रुग्णालयात प्रकल्प राबविण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल