शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 20:33 IST

- अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय, सोशल मीडियावर अपघाताविषयी हळहळ; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

पिंपरी : कुंडमळा येथे साकव पूल कोसळून झालेल्या अपघाताबद्दल सोशल मीडियावर नागरिक, नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे, हळहळ व्यक्त केली आहे. तर प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.  “अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय,” अशी टीका केली आहे. तर  पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे जिल्ह्यातील पूल दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गृहमंत्री अमित शाहांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पूल दुर्घटनेची माहिती घेतली आहे.  

मावळातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुपारी तीनच्या सुमारास कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला. अजूनही आकडा निश्चित नाही. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. सोशल मीडियावरून घटनेची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात असून विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “पूल गिरने की घटना से दुखी हूं.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे जिल्ह्यातील पूल दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून घटनेविषयी चर्चा केली. अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट केली आहे – “पूल गिरने की घटना से दुखी हूं. पीड़ित परिवार के प्रति संवेदना. घायलों के जल्दी ठीक होने की कामना,” अशी संवेदना शहा यांनी व्यक्त केली आहे.

माजी सनदी अधिकारी महेश झगडे म्हणाले, “इंद्रायणी पूल कोसळला. मी पुन्हा सांगतोय, अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय.”

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी म्हणाले, “पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मावळमधील एक पूल कोसळून अनेक जणांचा जीव गेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि जखमी झालेले नागरिक, पर्यटक लवकरच बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना. नदीत अडकलेल्यांना तातडीने मदत द्यावी.”

नागरिक नासिर शेख म्हणाले, “घरातून बाहेर पडताना आपल्या आपल्या जबाबदारीने बाहेर पडा. सर्व ठिकाणी डबल इंजिन सरकारचे महाविकास होत आहे. जसे पूल, रेल्वे, रस्ते, विमान, मेट्रो बस यांचे कधी काय होईल, सांगता येत नाही.”

नागरिक प्रदीप थत्ते म्हणाले, “हे सगळं इंस्टाग्रामच्या इन्फ्लुएन्सर मुले-मुलींनी या ब्रिजवर उभे राहून इतक्या रिल्स टाकल्या की, सगळी गर्दी वाढली तिथे. हा पूल जुना आहे, गावातले लोक नेहमी सांगत असत — त्यावर जास्त गर्दी करू नका. पण नाही, लोक उलट दुचाकी गाड्या घेऊन घुसत होते. आगाऊपणा नडत आहे. अशाच घटना दरवर्षी भुशी डॅमलाही घडतात.”

अजिंक्य आयरेकर म्हणाले, “उत्साहातून लोकांकडून होणारी निष्काळजीपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय दुर्लक्ष. असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत. आता प्रशासकीय नाटक, दोषारोपाचा खेळ सामान्य लोकांचे जीव घेतल्यानंतर सुरू होईल. सार्वजनिक ठिकाणी बारकाईने लक्ष नाही, नियोजन नाही आणि सार्वजनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.”

आनंद झांबरे म्हणाले, “मृत्यू हा स्वस्त झाला आहे. याच्याशी कुणाला काही देणं-घेणं नाही. फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार. तो भाऊ आला जवळ आणि हा भाऊ जवळ आला — यामध्येच आपण आहोत. जोपर्यंत आपण स्वतःहून सुधारणार नाही, या गोष्टी चालतच राहणार.”

कुणाल चौधरी म्हणाले, “पुण्यात पूल कोसळला, केदारनाथ येथे हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली, गुजरातमध्ये विमान अपघात झाला. हे काय होत आहे? हा भाजपाचा असली चेहरा आहे का? जिथे मृत्यू इतका स्वस्त झाला आहे, जिथे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत, याबाबत सरकारला काहीही चिंता नाही. हे दुर्दैव आहे.”

अनिकेत कुमार अवस्थी म्हणाले, “अपघातांचा सिलसिला कमी होत नाही. इंद्रायणी नदीवरील पूल पडून झालेल्या अपघातात अनेक जण अडकले आहेत. त्यांना तातडीने मदतकार्य देणे गरजेचे आहे.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळ