शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
3
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
4
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
5
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
6
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
7
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
8
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
9
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
10
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
11
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
12
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
13
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
15
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
16
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
17
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
18
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
19
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
20
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंड्यांची वाट बिकट; वारकऱ्यांची सुरक्षा रामभरोसे; जीव मुठीत धरून चालवं लागतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:59 IST

- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटातून आळंदीला जाणाऱ्या कार्तिक एकादशीच्या वारीतील पायी दिंडीत भरधाव कंटेनर वाहन शिरल्याने एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला

चाकण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी वारीसाठी पुणे, नाशिक आणि जुना पुणे-मुंबई महामार्गाने आळंदीकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सतत वाहतूक करणाऱ्या या महामार्गावर वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वारकऱ्यांना जीव धोक्यात घालून जपून चालावे लागत असल्याचे दिसत आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीकडे पायी वारी सुरू आहे. मात्र, ११ कार्तिक, मंगळवारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटातून आळंदीला जाणाऱ्या कार्तिक एकादशीच्या वारीतील पायी दिंडीत भरधाव कंटेनर वाहन शिरल्याने एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जाहीर झाला आहे. श्रीक्षेत्र आळंदीकडे पायी पालखी दिंडीमध्ये सर्वांत पुढे पताकाधारी असतो, त्याच्या मागे टाळकरी आणि विणेकरी, त्यापुढे तुळशी वृंदावन सोडलेल्या महिला आणि भाविकांचा समावेश असतो. पताकाधारी चालत असल्याने दिंडीही त्या क्रमाने चालू असते.

महामार्गावरील सततची प्रचंड वाहतूक कोंडी आणि विरुद्ध दिशेने येणारी सुसाट वाहने यामुळे वारकऱ्यांना पायी चालायला देखील रस्ता शिल्लक राहत नाही. त्यामुळे दिंड्यांतील वारकऱ्यांवर अपघाताचा धोका कायम आहे. आळंदी कार्तिकी यात्रेच्या बैठकीत दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचा विषय कधीही प्राधान्याने चर्चेत येत नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याने कार्तिकी दिंडीची वाट बिकट आणि अपघाती ठरत आहे. पंढरपूर पालखी मार्गावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार इतर महत्त्वाच्या दिंडी मार्गांवर साधी रस्ते सुरक्षितता आणि तात्पुरत्या सुविधा पुरवत नाही, याबाबत वारकरी खंत व्यक्त करत आहेत.

दिंडीमधील वारकऱ्यांची स्वयंसेवकांद्वारे काळजी घेतली जाते; मात्र बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका संभवतो. धर्माचे रक्षण करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या रक्षणाची जबाबदारी अथवा दखल सरकारकडून घेतली जात नाही, याची खंत वाटते. दिंडी मार्गावरील स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे हभप मुक्ताजीदादा नाणेकर, चाकण यांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pilgrims' perilous path to Alandi; safety at risk.

Web Summary : Pilgrims walking to Alandi face dangers due to heavy traffic and lack of safety measures. A recent accident highlighted the risks, with concerns raised about government support for pilgrim routes. Police vigilance is crucial for devotee safety.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे