शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 13:41 IST

विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याने लिखाणाचा सराव कमी

पिंपरी : सलग दोन वर्षे शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होता. या ऑनलाइन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या प्रमाणात कमी झाला. आता दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशावेळी लिखाणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागत आहे. उत्तरे लिहिण्यासाठी वेळ पुरत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करू लागले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव न राहिल्याने परीक्षा देताना त्यांची मोठी कसरत होते आहे. मात्र, हे आव्हान पेलण्याचे कसब विद्यार्थ्यांना दाखवावे लागणार आहे. ऑनलाइनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाइन सुरू झाले. बहुतांश विद्यार्थी सध्या घरात बसूनच ऑनलाइन अभ्यास करू लागले आहेत. परिणामी, विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सलग तीन तास लिहिण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

लिखाणाचा सराव आवश्यक...

हस्तलेखनाबाबतीत विद्यार्थ्यांनी वेळीच दक्षता बाळगून लिखाणाचा सराव करावा, म्हणजे त्यांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.

यावर्षी असणार असे बदल!

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र, यावेळी परीक्षेत काही बदल करण्यात आले आहेत. ज्यात गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. सोबतच दहावी-बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहत आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थी