शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 19:00 IST

मावळातील शेलारवाडी जवळ इंद्रायणी नदीवर साकव पूल आहे. तो पुल अरुंद आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून करावा येथील नागरिकांना प्रवास करावा लागत होता. एक तर हा पूल अतिशय अरुंद असून एका वेळी एकच दुचाकी पुलावरुन जाऊ शकते.

मावळ (पिंपरी-चिंचवड)  :मावळमधील शेलारवाडीजवळील कुंडमळ्यातील साकव पुल धोकादायक असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी पूल कोसळला आहे. धोकादायक पूल आणि तुटलेले कठडे, बाहेर निघालेल्या लोखंडी सळ्या यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली होती. मावळातील शेलारवाडी जवळ इंद्रायणी नदीवर साकव पूल आहे. तो पुल अरुंद आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून करावा येथील नागरिकांना प्रवास करावा लागत होता. एक तर हा पूल अतिशय अरुंद असून एका वेळी एकच दुचाकी पुलावरुन जाऊ शकते. या परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे अनेक वेळा जीव मुठीत धरून पर्यटकांना प्रवास करावा लागत आहे. 

शेलारवाडी ते कुंडमळा या भागाला जोडणारा हा प्रमुख पूल आहे.  संरक्षण विभागाने प्रथम लोखंडी साकव पूल बांधला होता. परंतु तो पूर्ण नव्हता. या पुलाच्या दोन्ही बाजूने उतार होता. पावसाळ्यात इंद्रायणीला पाणी आले की नागरिकांना प्रवास करणे धोकादायक झाले होते. त्यामुळे नागरिक या पुलावरुन जाणे टाळत असत. पुलाचे ऑडिट करण्याची मागणीदेहूरोडकडून इंदोरीमार्गे आणि देहूरोडकडून देहूगाव, सांगुर्डी ते कॅडबरी कंपनीमार्गे कुंडमळा आणि कान्हेवाडीकडे जावे लागत होते. २५ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार रुपलेखा ढोरे यांनी या लोखंडी पुलाला जोडून पुढे मिसाईल प्रकल्पाच्या भिंतीपर्यंत समांतर असा सिमेंटमध्ये पूल जोडला होता. त्यामुळे नागरिक ये-जा करू शकत होते; परंतु सध्या हा पूल कमजोर झाला असून, एका ठिकाणी किमान सात ते आठ फूट लांबीपर्यंत या पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. त्याच्या सळ्या उघड्या पडल्या असल्यामुळे एखाद्याचा चुकून तोल गेला तर जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पुलाचे ऑडिट करून हा पूल किमान सात ते आठ फुटांचा तयार करावा. तसेच, बोडकेवडी आणि कान्हेवडीला जोडणार्‍या बंधार्‍याचे देखील दुरुस्ती करून त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुरुस्तीच्या कामात आडकाठीबोडकेवडी आणि कान्हेवडीला जोडणाऱ्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. येथून दुचाकीवरून प्रवास करताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने आतापर्यंत अनेकांना जलसमाधी मिळाली आहे. मात्र, या पुलाच्या कामात संरक्षण विभाग आडकाठी आणत असल्यामुळे याचे काम रखडले आहे. कुंडमळा येथील पूल धोकादायक झाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. – रवींद्र भेगडे,  प्रचारप्रमुख, मावळ भाजप

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेmavalमावळAccidentअपघात