शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

गळक्या छताखाली विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 14:51 IST

अनेक शाळांमध्ये घाणीचे साम्राज्य, पावसामुळे गळके छत, भिंतींना भेगा अन् अपुरी बाक संख्या असल्याने जमिनीवर बसून धडे गिरवणारे विद्यार्थी, असे विदारक चित्र ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले. 

ठळक मुद्दे महापालिका शाळांची दुरवस्था : दुरवस्था झालेल्या वर्ग खोल्या, शाळांच्या धोकादायक इमारती

शीतल मुंडे -पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या काही शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे वाकड, पिंपळे गुरव, थेरगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर व कासारवाडी या भागांतील अनेक शाळांमध्ये घाणीचे साम्राज्य, पावसामुळे गळके छत, भिंतींना भेगा अन् अपुरी बाक संख्या असल्याने जमिनीवर बसून धडे गिरवणारे विद्यार्थी, असे विदारक चित्र ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले.  पुण्यातील कोंढवा व आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक कामगार व मजुरांचा नाहक बळी गेला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारतींची ‘लोकमत’ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी येथील असुविधा व समस्यांचा पाढा वाचून दाखविला. एका बाजूला महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याचा गाजावाजा करीत राजकीय वजन असलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रभागात ई-लर्निंगचा उपक्रम राबवित आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शहरातील अनेक भागांत महापालिकेच्या शाळेत शिक्षणाचे धडे घेण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. काळेवाडी, रहाटणी, थेरगाव व वाकड येथील अनेक शाळांमध्ये किमान मूलभूत सुविधाही विद्यार्थ्यांना नाहीत. शाळांच्या भिंतींना भेगा अन् त्यामधून पाणी झिरपत असल्याने त्यावर शेवाळे आले आहे. स्थानिक नगरसेवकांचे लक्ष असलेल्या मोजक्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सुविधा आहे. मात्र, उर्वरित अनेक शाळांमध्ये फायबरच्या टाकीमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आलेले आहे. या टाक्या नियमितपणे स्वच्छ केल्या जात असल्याने शेवाळ साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. काही शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असूनही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याविषयी शाळांनी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. शाळांमध्ये शिक्षकांची वानवा शहरातील काही शाळेंची पटसंख्या अतिशय चांगली आहे. मात्र त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. यामुळे तासिका तत्त्वावरील शिक्षकांवर याचा भार येत आहे. शाळेच्या प्रमुख्यांनी वेळोवेळी शिक्षकांची मागणी केली. मात्र त्यांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले नाही. यामुळे एका वर्गामध्ये ७५ ते ८० विद्यार्थी एकाच वेळी शिक्षण घेताना दिसत आहेत. ........* शाळांची सुरक्षा रामभरोसे महापालिकेने प्रत्येक शाळेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. प्रत्यक्षात बहुतांश शाळांमध्ये पाहणी केली असता, सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळून आले़ तर काही सुरक्षारक्षक गणवेशामध्ये नसल्याने शाळांचा सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसले. .........* शाळांभोवती कचरा शहरातील काही शाळांमधील वर्गखोल्या गळतात. त्याच गळक्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. आजूबाजूच्या परिसरात कचरा साचला आहे. मात्र, शाळेच्या हद्दीबाहेर असल्याने तो उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा अस्वच्छ परिसरात विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत..........* संगणक धूळ खातमहापालिकेच्या शाळांमध्ये महापालिकेतर्फे संगणक उपलब्ध करून देण्यात आले. मात्र शाळांमध्ये प्रशिक्षण देणारे शिक्षक नसल्याने संगणक धूळ खात पडलेले आहेत. पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरातील शाळांमध्ये संगणक कक्षामध्ये पाणीगळती होत आहे........* फाटके गणवेशमहापालिकेतील ठेकेदार, पदाधिकारी व प्रशासनाच्या वादामुळे यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. त्यामुळे जुने व फाटलेले गणवेशासह विद्यार्थी शाळेत येत असल्याचे चित्र बºयाच शाळांमध्ये दिसून आले.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण