शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आयटीयन्सना नियमांचे वावडे, हिंजवडी वाहतूक पोलिसांची कारवाई, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा एकूण दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:31 IST

हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे.

- बेलाजी पात्रेवाकड : हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक आयटीयन्सची संख्या असून, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा दंड वसूल केला.शहराच्या विविध भागातून हिंजवडीमधील आयटी कंपन्यांत अभियंते रोज ये -जा करतात. त्यामध्ये दुचाकींवरून प्रवास करणारांची संख्या मोठी आहे. या भागात पर्यायी रस्ता नसल्याने रोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहेत. त्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कोंडीत भर पडत आहे.हिंजवडी पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत २ हजार २९८ विनाहेल्मेट दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली. तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एवढेच नव्हे, तर याच ११ महिन्यांत सीट बेल्ट न वापरणाºया १३५१ चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करून २ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर लेन कटिंग करून वाहतूक नियम मोडणाºया २६५ कारवाईत ५३ हजार रुपयांचा दंड जमा झाला. त्यात डिसेंबरमधील कारवाईचा आकडा धरल्यास ही संख्या खूप पुढे जाईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.रोज दीडशेजणांना दंडहिंजवडीत सरासरी दररोज १० ते १३ कारवाई केवळ हेल्मेट न घालणाºया वाहनचालकांवर होते. तर सीट बेल्ट, लेन कटिंग, नो पार्किंग, मोबाईल टॉकिंग, कागदपत्रे न बाळगणे, रॉँग साइडने वाहन चालविणे, प्रिंटेड काचा, लायसन्स जवळ न बाळगणे, डी.डी, अवैध प्रवासी वाहतूक, नो एंट्री यासह अन्य अशा सुमारे १४० ते १५०च्या आसपास कारवाई केवळ आयटी पार्कच्या हिंजवडी परिसरात होते. या प्रत्येक वाहतूक नियमांच्या कारवाईसाठी एका कर्मचाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक कारवाई विभागून देण्यात आल्याने एखाद्या कारवाईच्या शेवटपर्यंत सर्व कार्यवाही त्या संबंधित कर्मचाºयाने जबाबदारी पार पडायची, असे नियोजन आहे.सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊसहिंजवडीत वाहतूक समस्या काही काळापुरती का होईना झाल्यास त्याचे पडसाद सोशल मीडियावर अधिक उमटतात. लगेच ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अप, इंस्टाग्राम, मेल यावर चर्चेला उधाण येते, तर तक्रारींचा पाऊस पडतो. हिंजवडीतील खास वाहतूक समस्येसाठी काही आयटीयन्स तरुण-तरुणींनी एकत्र येत व्हॉट्स अप, ट्विटरवर ग्रुप तयार केले आहेत. त्यावर मध्यंतरी सह्यांची मोहीमदेखील राबविण्यात आली. तर प्रशासकीय-शासकीय आणि संबंधित मंत्र्यांना देखील ही सर्व मंडळी सोशल मीडियातून जाब विचारतात.जनजागृतीसाठी पुढाकारहिंजवडीत सुमारे सव्वाशे आयटी कंपन्या, तसेच इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल व अन्य पकडून १७०० कंपन्या आहेत. यात काम करणारे सुमारे दोन लाख ३० हजार आयटीयन्स आणि इतर कामगार पकडून किमान तीन लाखांच्या वर हा आकडा जातो.वाहतूककोंडी नित्याचीसुमारे ४० ते ५० टक्के लोक कंपनीच्या कॅब, बस, मेट्रो झिप, सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करतात. मात्र उरलेले किमान ५० टक्के म्हणजेच जवळपास दीड लाख प्रवासी दुचाकी वा कारने प्रवास करतात. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.फ्लेक्सद्वारे जनजागृतीगेल्या आठवड्यापासून हिंजवडी वाहतूक विभाग वाहतूक जनजागृती अभियान राबवत आहे. या अंतर्गत हिंजवडीतील महत्त्वाच्या २५ चौकांत वाहतूक नियम सांगणारे चित्रासह फ्लेक्स लागले असून, यांसह कंपन्यांतून जनजागृती सुरू आहे.आयटीयन्सनी सहनशीलता ठेवावीहिंजवडी परिसरात सकाळ-सायंकाळी दोन वेळेस एक बाजूचा रस्ता ओसंडून वाहतो. थोडे फार जॅमिंग झाले, तर लगेच विरुद्ध दिशेने वाहने घातली जातात. तसे न करता थोडी सहनशीलता ठेवावी. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊ लागली आहे. आयटीयन्सनी थोडा धीर व सहनशीलता ठेवल्यास कोंडी कमी होण्यास मदत होईल.- दत्तात्रय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग हिंजवडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड