शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

जडीबुटी विक्री व्यवसायाला घरघर.... उदर निर्वाहासाठी मेंढीपालनाचा जोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 20:33 IST

आरोग्य क्षेत्रात पारंपरिक वारसा हक्काने काम करणाऱ्या जडीबुटीची औषधे देणाऱ्या वैद्यराजांवर मात्र व्यवसाय सोडण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देराजस्थानातील चित्तोडिया परिवाराने शोधला पर्यायया ओढाताणीच्या जीवनात विरंगुळा म्हणून करमणुकीसाठी कधी कधी एडक्यांची झुंज

शशिकांत जाधवतळवडे : सध्या माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. मानव तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करत आहे. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रही याला अपवाद नाही. तंत्रज्ञानामुळे उद्योग, व्यवसाय यामध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलल्याने जुन्या क्लृप्त्या, संकल्पना आणि पद्धतीमागे पडत आहेत. यामुळे काही उद्योग, व्यवसाय कालबाह्य ठरत आहेत. राजस्थानातील चित्तोडिया परिवाराचा जडीबुटी विक्रीचा व्यवसाय आहे.देशभर भ्रमंती करून हा व्यवसाय या परिवाराकडून पिढ्यानपिढ्या करण्यात येत आहे. मात्र, सध्या या व्यवसायाला घरघर लागल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी या परिवाराने मेंढी पालनाचा जोडधंदा सुरू केला आहे. या परिवाराने सध्या तळवडे परिसरात पाल मांडून मुक्काम ठोकला आहे.घरंदाजपणे जडीबुटी औषधे विक्रीचा व्यवसाय करणारा मूळचा राजस्थान येथील असलेला चित्तोडिया परिवार. या परिवारातील शांतीबाई चित्तोडिया यांनी नव्वदी गाठलेली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शिक्षण, खरेदी, विक्री, आरोग्य या क्षेत्रांतही आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर आजाराचे निदान आणि त्यावरील उपचार यामध्ये गतिमानता आली. वैद्यकीय क्षेत्रात सर्वांत जास्त प्रगती झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे आरोग्य क्षेत्रात पारंपरिक वारसा हक्काने काम करणाऱ्या जडीबुटीची औषधे देणाऱ्या वैद्यराजांवर मात्र व्यवसाय सोडण्याची वेळ आली आहे.गावोगावी पाल उभारून मजल-दरमजल करत संपूर्ण भारतभर फिरून विविध आजारांवर, रोगावर जडीबुटीचे रामबाण औषध देऊन रुग्णांना आजारापासून मुक्त करण्याचे काम करणाऱ्या वैद्यराजांच्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घरघर लागली आहे. आधुनिक काळात आजार आणि उपचार क्षेत्रात गरुडझेप घेत मानवाने प्रगती केली. उपचार पद्धतीत झालेले बदल, चौकाचौकांमध्ये थाटलेले दवाखाने, तत्परतेने मिळणारी सेवा यामुळे रुग्णांची विश्वासार्हता वाढली. सहज उपलब्ध होणारी औषधे, आॅनलाइन मिळणारी माहिती यामुळे वारसा पद्धती काम करणाऱ्या वैद्यांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या रोडावत गेली आणि या व्यवसायात काम करणाऱ्या वैद्यराजांना इतर पर्यायी व्यवसाय स्वीकारण्याची वेळ आली आहे. परंतु, यावेळेस त्यांनी मुलांना जडीबुटीचा व्यवसाय करता करता इतर काही तरी करता येते का याचा धांडोळा घेण्याचा सल्ला मुले काल्त्यासिंग आणि पिंटुसिंग यांना दिला आणि नवा व्यवसाय शोधला. ...............

काळाच्या ओघात जडीबुटीचा व्यवसाय मागे पडत असल्याने चार ते पाच वर्षांपासून तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथून टकरीचा मेंढा अर्थात एडका विकत घ्यायचा. त्याचा सांभाळ करायचा आणि तो धष्टपुष्ट झाला की, त्याची विक्री करायची असा जोडधंदा या कुटुंबाने सुरू केला आहे. कुर्बानीसाठी या एडक्यांना जास्त मागणी असते, असे या कुटुंबीयांकडून सांगण्यात येते. यातून मिळणाऱ्या नफ्यावरच या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याची कसरत सध्या त्यांना करावी लागत आहे. पारंपरिक व्यवसाय गटांगळ्या खात असतानाही नवीन जोडधंदा स्वीकारून पुन्हा जीवनाला उभारी देत हे कुटुंब उभे राहिले आहे. या ओढाताणीच्या जीवनात विरंगुळा म्हणून करमणुकीसाठी कधी कधी एडक्यांची झुंज लावली जाते. यावेळी कुटुंबातील महिला, लहान मुले आणि पुरूष सर्वच जण याचा मनमुराद आनंद घेतात.     - शांतीबाई चित्तोडिया

टॅग्स :talawadeतळवडेmedicineऔषधंforestजंगलRajasthanराजस्थान