शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुणे-नाशिक रेल्वेसाठी एमआरआयडीसी कंपनीची स्थापना, खासदार शिवाजीराव आढळराव यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 3:52 PM

पुणे-नाशिक या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी नीती आयोगाकडे गेला आहे.

- हनुमंत देवकर चाकण - पुणे-नाशिक या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी नीती आयोगाकडे गेला आहे. नीती आयोगाची मान्यता मिळताच एमआयआरडीसीच्या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. सुरुवातीला ९०० कोटींच्या या प्रकल्पाची किंमत वाढून ती २४२५ कोटींवर गेली होती. मात्र आता या प्रकल्पासाठी ५५०० कोटींच्या आसपास खर्च येणार असून त्यापैकी सुमारे १२०० कोटी हे केवळ भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत. तर रेल्वेमार्ग जाणारी जमीन ही दरी-डोंगरातून जात असल्याने तेथील जमीन सपाटीकरणाच्या कामांना सुमारे १२०० कोटी खर्च येणार आहे, तर उर्वरीत रक्कम प्रत्यक्ष रेल्वेलाईन, स्टेशन आदींसाठी खर्च होणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उपमुख्य अभियंता गुप्ता यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज उपमुख्य अभियंता, मध्य रेल्वे, पुणे विभाग यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत रेल्वेमार्गाचा नकाशा, संभाव्य रेल्वे स्थानके ( स्टेशन्स ), भूसंपादनासाठी लागणारे क्षेत्र आणि रेल्वेमार्ग जात असलेल्या गावांच्या माहितीचे सादरीकरण उपमुख्य अभियंता गुप्ता यांनी केले. या रेल्वेमार्गावर एकूण ११ बोगदे बांधण्यात येणार असून त्यांची एकत्रित लांबी १३.१२७ कि.मी. इतकी असणार आहे. यापैकी सर्वांत मोठा ६ कि.मी. लांबीचा बोगदा पापळवाडी (ता. खेड) ते वाळुंजवाडी (ता. आंबेगाव) दरम्यान बांधण्यात येणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. पाचशे कोटींपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांना नीती आयोगाची मान्यता आवश्यक असल्याने सध्या हा प्रकल्प नीती आयोगाकडे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकार या रेल्वेमार्गासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के वाट उचलणार असून या रेल्वे मार्गासाठी स्थापन केलेल्या एमआरआयडीसी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून या अधिकाऱ्यास रेल्वे पदमुक्त केल्यानंतर ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया होईल. त्यानंतर पुन्हा एकदा भौगोलिक सर्व्हेक्षण करण्यात येऊन भूसंपादनाचे प्रत्यक्ष क्षेत्र निश्चित होऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची उभारणी होणे हे आपण पाहिलेले एक स्वप्न होते आणि ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असले तरी त्यासाठी मी लढलेली लढाई, केलेला संघर्ष हा अविस्मरणीय आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी पुढील काळात मलाच लक्ष ठेवून प्रयत्न करावे लागणार आहेत. हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे काम माझ्या राजकीय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरेल असा आशावाद खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPuneपुणेNashikनाशिकShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव