शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मासेमारीसाठी होतोय स्फोटकाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:13 IST

पवना नदीपात्रातील केजुबाई बंधाऱ्यामध्ये मृत मासे आढळल्याने शहरातील अस्वच्छ नदीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते.

पिंपरी - पवना नदीपात्रातील केजुबाई बंधाऱ्यामध्ये मृत मासे आढळल्याने शहरातील अस्वच्छ नदीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते. तसेच अलीकडे मासेमारीसाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाचा ºहास होत आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींकडून याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.मासेमारी करण्यासाठी प्रामुख्याने गळ किंवा जाळ्याचा वापर केला जातो. मात्र अलीकडे मोठ्या प्रमाणावर मासे मिळवण्यासाठी मासेमारी करणारे नवीन पद्धतीचा अवलंब करताना दिसून येत आहे. त्यासाठी धोकादायक अशा रसायनांचा वापर केला जातो. खोल पाण्यातील मासे पकडण्यासाठी पाण्यामध्ये रसायन सोडले जाते. त्यामुळे पाण्यातील आॅक्सिजन विरळ होतो. अशा वेळी खोल पाण्यातील मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येतात. पाण्यामध्ये स्फोट करूनही मासेमारी केली जाते. गव्हाच्या कणकेमध्ये भुलीची पावडर टाकली जाते. मासे ती गोळी खातात. परिणामी माशांचा मृत्यू होतो.दरम्यान, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महापालिका पर्यावरण विभागाचे अधिकारी, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांचे पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी संस्था यांनी एकत्रित येऊन माशांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पाहणी केली. पाण्याचे नमूने प्रदूषण मंडळाने जमा केले असून, ते तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच मृत मासे विच्छेदनासाठी पाठविले आहेत. प्रदूषित पाणी आणि शवविच्छेदन अहवालानंतर यामागील कारण स्पष्ट होणार आहे.स्फोटाद्वारे मासेमारी करण्याची नवीन प्रक्रिया आली आहे. ती घातक आहे. त्यामुळे संपूर्ण नदीपात्राचे पाणी प्रदूषित होत आहे. या पद्धतीने मासेमारी केलेले मासे माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. यातून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा संभाव्य धोका प्रशासनाने ओळखून अशा प्रकारे मासेमारी करणाºयांवर कडक कारवाई केली पाहिजे.- सोमनाथ मुसुडगे, अध्यक्ष, रानजाई संस्था, देहूनदीपात्राच्या पाहणीदरम्यान अनेक नाले, मलनिस्सारण वाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. जागोजागी फुटलेल्या वाहिन्यांमुळे सांडपाणी एसटीपीपर्यंत प्रक्रिया होण्यासाठी पोहचत नाही याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना देण्यात आला आहे.- हसन मुल्ला, आरोग्य निरीक्षक, पर्यावरण विभाग१सांडपाण्यामुळे नदीपात्रामध्ये दूषित पाण्याचा विसर्ग ताथवडे गाव, पुनावळे हद्द, वाल्हेकरवाडी येथून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी नदीमध्ये नाल्याद्वारे प्रक्रिया न करता सोडण्यात येते. हे नाले नदीपात्रात ज्या ठिकाणी मिळतात तेथील पाण्याचा सामू ६ ते ७ आढळून आला आहे. या ठिकाणी महापालिकेची कोणतीही सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यरत नाही.२तपासाबाबत पर्यावरण प्रेमींची साशंकता प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाने मृत माशांची कारणे शोधताना घरगुती सांडपाण्यामुळे मासे मृत झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्रातील पाणी सध्यातरी यासाठी कारणीभूत नाही, असे मत अधिकाºयांनी मांडले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड