शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

इंद्रायणीबाबत शिंदे, पवारांना सांगूनही फरक नाही, हे दुर्दैवच! निरंजननाथ महाराजांच्या भावना

By विश्वास मोरे | Updated: June 25, 2024 13:54 IST

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली ...

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, याबाबत कोणतीही उपाययोजना झालेली नाही, अशी आमची भावना आहे. वारीच्या अनुषंगाने इंद्रायणी प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार या संवेदनशील नेत्यांनी सांगूनही फरक पडत नसेल, तर दुर्दैव आहे, असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे, अशी खंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. निरंजननाथ महाराज यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत निरंजननाथ महाराजांनी अत्यंत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. महाराज म्हणाले, 'वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समवेत जेव्हा बैठका झाल्या. तेव्हा, देहू आणि आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर, नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत कटाक्षाने प्रकाश टाकला. मात्र, यावर तोडगा निघालेला नाही, ही बाब दुर्दैवी आहे. दाद मागायची कोणाकडे?'

कार्तिकी उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. एवढंच नव्हे तर नदीचे कोणत्या भागामध्ये प्रदूषण होते, याबाबत अत्यंत सूक्ष्म माहिती दिली मात्र, एमपीसीबी आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे घडायचे तेच घडले. तीर्थक्षेत्र विकासाबाबत घोषणा केल्या जातात. मात्र, त्याबाबत प्रत्यक्षात कारवाई कमी होत आहे, अस संताप व्यक्त केला.

याला जबाबदार कोण-

निरंजननाथ महाराज म्हणाले, 'आषाढी-कार्तिकीच्या निमित्ताने वारकरी देहू आळंदीत येतात आणि 'ज्ञानोबा तुकोबा' असे स्मरत इंद्रायणीमध्ये स्नान करतात. जल प्रदूषणाची दूषित पाण्याची डुबकी त्यांना घ्यावी लागते आहे. पुणे जिल्ह्यातून वाहणारी इंद्रायणी आणि त्यापुढे होणारी भीमा थेट चंद्रभागेत जाऊन मिळते. आपल्या भागातील प्रदूषण युक्त पाणी पुढे जाते. वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.'  

आंदोलन करणे उपाय नाही-

नदी प्रदूषणाबाबत दाखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा काहींनी दिला आहे, याबाबत निरंजन महाराज म्हणाले, 'आंदोलन करणे हे फलित असू शकत नाही. यावर तोडगा काढण्याची गरज आहे. वारकऱ्यांना वीस हजार अनुदान देण्याबाबत समिती नेमली जाते. मात्र, नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी समिती नेमली नाही. ती तातडीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. नदी प्रदूषण का कोठे कसे होत आहे, याबाबत अहवाल घेऊन त्यावर तातडीने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. जीवन देणारी इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे नदीचे पाणी जीवघेणी ठरू शकते.

त्याचा घाण वास येतो कसा?

मला वाटते, वारकरी संप्रदाय आणि प्रशासनाच्या बैठकांमध्ये केवळ चर्चा होते. मात्र, जलप्रदूषणावर प्रभावी उपाययोजना होत नाही. अधिकारी प्रशासन, गांभीर्याने घेत नाही, ही बाब राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळांने वेगळाच कयास काढलेला आहे. त्यांच्या मते संबंधित पाणी हे साबणाचे आहे, मग जर पाणी हे साबणाचे असेल, तर त्याचा घाण वास येतो कसा? याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासन, जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहेत, त्यांनी नदीत इंद्रायणी मातेच्या प्रदूषणाचा विषय तातडीने दूर करण्याची गरज आहे. देहू-आळंदीत येणारे वारकरी श्रद्धेने इंद्रायणीत स्नान करतात. त्यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे,असे निरंजन महाराज म्हणाले.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpurपंढरपूरPuneपुणेindrayaniइंद्रायणी