शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
2
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
3
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
4
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
5
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
6
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
7
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
8
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
9
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
10
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
11
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
12
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
13
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
14
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
15
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
16
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
18
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
19
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
20
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय

इंद्रायणीबाबत शिंदे, पवारांना सांगूनही फरक नाही, हे दुर्दैवच! निरंजननाथ महाराजांच्या भावना

By विश्वास मोरे | Updated: June 25, 2024 13:54 IST

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली ...

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, याबाबत कोणतीही उपाययोजना झालेली नाही, अशी आमची भावना आहे. वारीच्या अनुषंगाने इंद्रायणी प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार या संवेदनशील नेत्यांनी सांगूनही फरक पडत नसेल, तर दुर्दैव आहे, असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे, अशी खंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. निरंजननाथ महाराज यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत निरंजननाथ महाराजांनी अत्यंत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. महाराज म्हणाले, 'वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समवेत जेव्हा बैठका झाल्या. तेव्हा, देहू आणि आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर, नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत कटाक्षाने प्रकाश टाकला. मात्र, यावर तोडगा निघालेला नाही, ही बाब दुर्दैवी आहे. दाद मागायची कोणाकडे?'

कार्तिकी उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. एवढंच नव्हे तर नदीचे कोणत्या भागामध्ये प्रदूषण होते, याबाबत अत्यंत सूक्ष्म माहिती दिली मात्र, एमपीसीबी आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे घडायचे तेच घडले. तीर्थक्षेत्र विकासाबाबत घोषणा केल्या जातात. मात्र, त्याबाबत प्रत्यक्षात कारवाई कमी होत आहे, अस संताप व्यक्त केला.

याला जबाबदार कोण-

निरंजननाथ महाराज म्हणाले, 'आषाढी-कार्तिकीच्या निमित्ताने वारकरी देहू आळंदीत येतात आणि 'ज्ञानोबा तुकोबा' असे स्मरत इंद्रायणीमध्ये स्नान करतात. जल प्रदूषणाची दूषित पाण्याची डुबकी त्यांना घ्यावी लागते आहे. पुणे जिल्ह्यातून वाहणारी इंद्रायणी आणि त्यापुढे होणारी भीमा थेट चंद्रभागेत जाऊन मिळते. आपल्या भागातील प्रदूषण युक्त पाणी पुढे जाते. वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.'  

आंदोलन करणे उपाय नाही-

नदी प्रदूषणाबाबत दाखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा काहींनी दिला आहे, याबाबत निरंजन महाराज म्हणाले, 'आंदोलन करणे हे फलित असू शकत नाही. यावर तोडगा काढण्याची गरज आहे. वारकऱ्यांना वीस हजार अनुदान देण्याबाबत समिती नेमली जाते. मात्र, नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी समिती नेमली नाही. ती तातडीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. नदी प्रदूषण का कोठे कसे होत आहे, याबाबत अहवाल घेऊन त्यावर तातडीने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. जीवन देणारी इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे नदीचे पाणी जीवघेणी ठरू शकते.

त्याचा घाण वास येतो कसा?

मला वाटते, वारकरी संप्रदाय आणि प्रशासनाच्या बैठकांमध्ये केवळ चर्चा होते. मात्र, जलप्रदूषणावर प्रभावी उपाययोजना होत नाही. अधिकारी प्रशासन, गांभीर्याने घेत नाही, ही बाब राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळांने वेगळाच कयास काढलेला आहे. त्यांच्या मते संबंधित पाणी हे साबणाचे आहे, मग जर पाणी हे साबणाचे असेल, तर त्याचा घाण वास येतो कसा? याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासन, जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहेत, त्यांनी नदीत इंद्रायणी मातेच्या प्रदूषणाचा विषय तातडीने दूर करण्याची गरज आहे. देहू-आळंदीत येणारे वारकरी श्रद्धेने इंद्रायणीत स्नान करतात. त्यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे,असे निरंजन महाराज म्हणाले.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpurपंढरपूरPuneपुणेindrayaniइंद्रायणी