शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'शिक्षण एवढे मग हे काम कसे करू...' पोस्टमनचे काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांची मानसिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 10:00 IST

पोस्टमन पदासाठी उच्चशिक्षित मुले करताहेत अर्ज

पिंपरी : पोस्टमन पदासाठी शैक्षणिक पात्रता अवघी दहावी, बारावी पास आहे. मात्र, बेरोजगारीच्या काळात सरकारी नोकरी म्हणून बीएस्सी, बीटेक, इंजिनिअर झालेले तरुण-तरुणी या पदासाठी अर्ज करतात. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड होते. परीक्षा देताना आपण कोणत्या पदासाठी निवडले गेले आहोत, याची माहिती त्यांना असते. मात्र, काम करताना आपले शिक्षण एवढे झाले आहे त्यामुळे हे काम कसे करू, अशी मानसिकता निर्माण झाल्याने हे काम सोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

पिंपरी पोस्टात काम करणाऱ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या दोन पोस्टमन तरुणींनी कामाच्या अवघ्या दीड महिन्यांत राजीनामा दिला.पोस्टमन पदासाठी झालेल्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून एमपीएससी तसेच यूपीएससीचा अभ्यास करणारे तरुण, तरुणी यश मिळवितात. मात्र, अपेक्षेप्रमाणे पोस्ट न मिळाल्याने किंवा काम करताना यापेक्षा मोठी संधी आपल्याला मिळेल. म्हणून निवड झालेले तरुण-तरुणी दुसरी संधी शोधत असल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता नाही

पोस्टाकडून दरवर्षी नोकरीभरती केली जाते. त्यामुळे काहीजण जरी नोकरी सोडून जात असले तरी नव्याने दुसरे कर्मचारी रुजू होत असतात त्यामुळे काम करताना कर्मचाऱ्यांचा तुटवडा नसतो, असे पिंपरी पोस्ट कार्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक नितीन बने यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिसEmployeeकर्मचारीStudentविद्यार्थी