शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे आॅडिट करा

By admin | Updated: April 16, 2017 04:03 IST

पिंपरी-चिंचवड शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणीत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणीत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राला शुक्रवारी भेट दिली. त्यांनी योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. पाणीबचत ही काळाची गरज असून, महापालिकेने स्वत:पासून सुरुवात करावी, मुख्यालय, वायसीएम रुग्णालय, काही सोसायट्यांचे वॉटर आॅडिट करावे. त्याच्या आधारे पाणी बचतीच्या उपाययोजनेच्या शिफारसी स्थायी समितीला सादर कराव्यात, असे आदेशही दिले. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासोबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, प्रमोद ओंबासे उपस्थित होते. पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनीच स्वत:हून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले. त्यानंतर अध्यक्षा सावळे म्हणाल्या, ‘‘नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आधी महापालिकेने स्वत: पासून सुरुवात करण्याची गरज आहे. शहरातील पालिकेच्या आणि शासकीय इमारतींना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशेब ठेवला जात नाही. त्यामुळे अशा इमारतींना पाण्याचा किती पुरवठा होतो, हे समजणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका मुख्यालय आणि वायसीएम रुग्णालय आणि काही मोजक्या सोसायट्यांचे वॉटर आॅडिट करावे. या वॉटर आॅडिटमधून महापालिका मुख्यालय, वायसीएम रुग्णालय आणि संबंधित सोसायट्यांना पाण्याचा किती पुरवठा होतो आणि प्रत्यक्षात आवश्यकता किती आहे, याची माहिती समोर येईल. पाणीबचत आणि काटकसर करण्यासाठी काय उपाययोजना राबविता येतील, याच्या शिफारसी तयार कराव्यात.’’ मावळ तालुक्यामध्ये काही गावामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे मावळवासीयांची अवस्था धरणे उशाला आणि कोरड घशाला, अशी झाली आहे. शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. तसेच वॉशिंग सेंटर, वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच बांधकामासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे. ते बंद करावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)पाणीटंचाई : पर्यायी स्रोत उपलब्ध नाहीशहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्यमुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहेत. उन्हाळ्यात काही भागाला पाणीपुरवठा होतो, तर काही भागाला होत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थिती पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होत नाहीत. शहरासाठी पवना धरणातून दररोज किती पाणी उचलावे, ते निश्चित झाले आहे; परंतु निश्चित झालेल्या पाण्यापेक्षा दररोज १०० दशलक्ष घनमीटर पाणी जास्त उचलतो. त्यासाठी महापालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दंडही भरते. एवढे करूनही शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत दररोज दिले जाणारे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला कायद्याने ठरलेले दरडोई पाणी देणे महापालिकेला शक्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.