शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:53 IST

गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल ४० किलोमीटर पायी चालत आलो

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : आसाममधील शानगडला फिरायला गेलो होतो. दोन दिवस संततधार पाऊस सुरू होता. रस्त्यावरील वाहने पाण्यात वाहत जात होती. दरडी कोसळत होत्या. काय होतंय हे समजायच्या आत मोबाईलचे नेटवर्क गेले. कुटुंबाशी संपर्क होईना. पाऊस थांबल्यानंतर पूर ओसरला तरीही रस्त्यावर दीड ते दोन फुटांपर्यंत चिखल साचला होता. मदत मिळवायची तर कशी, असा प्रश्न होता. मात्र, नशीब बलवत्तर त्यामुळे आम्ही सुखरूप आलो. अशी भावना आसामच्या महापुरात अडकलेल्या चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना बोलून दाखवली.

चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके हे नोकरीनिमित्त चंडीगडला राहतात. तिथूनच जवळ असलेल्या शानगडला ते आपल्या ग्रुपसोबत फिरायला गेले. जाताना अगदी मस्त वातावरणाचा आनंद घेत ते मौज करत होते. शनिवारी, दि. ८ सकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने ते हॉटेलवरच थांबले. रविवारी मोबाईलची रेंज गेली. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. स्थानिक पोलिस स्टेशन दूर होते. तिथे पोहचण्याचे मार्गही बंद झाले होते. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्कही करता येत नव्हता.

गावकऱ्यांनी पायवाटेने आणले...

मंगळवारी पाऊस उघडल्यानंतर त्यांनी गावातील स्थानिकांशी भेटून माहिती घेतली. तेव्हा त्यांना दरडी कोसळल्याची माहिती कळली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी वापस येण्याचा निर्णय घेतला. गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल चाळीस किलोमीटर पायी चालत आलो. रस्ते पूर्णत: वाहून गेले आहेत. तिथून वाहने भेटली. चंडीगडच्या जवळ आल्यानंतर कुटुंबाशी संपर्क केला. अर्ध्या रस्त्यापर्यंत शासनाची मदत पोहचली होती, असे प्रथमेश साखरे याने सांगितले.

पन्नास मीटरवर जमीन खचली...

आम्ही चंडीगडहून शानगडला फिरायला शुक्रवारी (दि. ७) रात्री निघालो. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पोहोचलो. आम्ही जिथे थांबलो तिथून जवळच असलेली पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेलो. सकाळी दहाच्या दरम्यान संततधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी मोबाईलचे नेटवर्क गेले. तिथून आमचा कुटुंबाशी व नातेवाइकांशी संपर्क तुटला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथून अगदी पन्नास मीटरवर जमीन खचली होती. तब्बल ९६ तासांनंतर मोबाईलला रेंज आली, असे कृष्णा भडके यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणSocialसामाजिकNatureनिसर्गtourismपर्यटनAssamआसाम