शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:53 IST

गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल ४० किलोमीटर पायी चालत आलो

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : आसाममधील शानगडला फिरायला गेलो होतो. दोन दिवस संततधार पाऊस सुरू होता. रस्त्यावरील वाहने पाण्यात वाहत जात होती. दरडी कोसळत होत्या. काय होतंय हे समजायच्या आत मोबाईलचे नेटवर्क गेले. कुटुंबाशी संपर्क होईना. पाऊस थांबल्यानंतर पूर ओसरला तरीही रस्त्यावर दीड ते दोन फुटांपर्यंत चिखल साचला होता. मदत मिळवायची तर कशी, असा प्रश्न होता. मात्र, नशीब बलवत्तर त्यामुळे आम्ही सुखरूप आलो. अशी भावना आसामच्या महापुरात अडकलेल्या चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना बोलून दाखवली.

चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके हे नोकरीनिमित्त चंडीगडला राहतात. तिथूनच जवळ असलेल्या शानगडला ते आपल्या ग्रुपसोबत फिरायला गेले. जाताना अगदी मस्त वातावरणाचा आनंद घेत ते मौज करत होते. शनिवारी, दि. ८ सकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने ते हॉटेलवरच थांबले. रविवारी मोबाईलची रेंज गेली. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. स्थानिक पोलिस स्टेशन दूर होते. तिथे पोहचण्याचे मार्गही बंद झाले होते. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्कही करता येत नव्हता.

गावकऱ्यांनी पायवाटेने आणले...

मंगळवारी पाऊस उघडल्यानंतर त्यांनी गावातील स्थानिकांशी भेटून माहिती घेतली. तेव्हा त्यांना दरडी कोसळल्याची माहिती कळली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी वापस येण्याचा निर्णय घेतला. गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल चाळीस किलोमीटर पायी चालत आलो. रस्ते पूर्णत: वाहून गेले आहेत. तिथून वाहने भेटली. चंडीगडच्या जवळ आल्यानंतर कुटुंबाशी संपर्क केला. अर्ध्या रस्त्यापर्यंत शासनाची मदत पोहचली होती, असे प्रथमेश साखरे याने सांगितले.

पन्नास मीटरवर जमीन खचली...

आम्ही चंडीगडहून शानगडला फिरायला शुक्रवारी (दि. ७) रात्री निघालो. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पोहोचलो. आम्ही जिथे थांबलो तिथून जवळच असलेली पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेलो. सकाळी दहाच्या दरम्यान संततधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी मोबाईलचे नेटवर्क गेले. तिथून आमचा कुटुंबाशी व नातेवाइकांशी संपर्क तुटला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथून अगदी पन्नास मीटरवर जमीन खचली होती. तब्बल ९६ तासांनंतर मोबाईलला रेंज आली, असे कृष्णा भडके यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणSocialसामाजिकNatureनिसर्गtourismपर्यटनAssamआसाम