शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:53 IST

गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल ४० किलोमीटर पायी चालत आलो

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : आसाममधील शानगडला फिरायला गेलो होतो. दोन दिवस संततधार पाऊस सुरू होता. रस्त्यावरील वाहने पाण्यात वाहत जात होती. दरडी कोसळत होत्या. काय होतंय हे समजायच्या आत मोबाईलचे नेटवर्क गेले. कुटुंबाशी संपर्क होईना. पाऊस थांबल्यानंतर पूर ओसरला तरीही रस्त्यावर दीड ते दोन फुटांपर्यंत चिखल साचला होता. मदत मिळवायची तर कशी, असा प्रश्न होता. मात्र, नशीब बलवत्तर त्यामुळे आम्ही सुखरूप आलो. अशी भावना आसामच्या महापुरात अडकलेल्या चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना बोलून दाखवली.

चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके हे नोकरीनिमित्त चंडीगडला राहतात. तिथूनच जवळ असलेल्या शानगडला ते आपल्या ग्रुपसोबत फिरायला गेले. जाताना अगदी मस्त वातावरणाचा आनंद घेत ते मौज करत होते. शनिवारी, दि. ८ सकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने ते हॉटेलवरच थांबले. रविवारी मोबाईलची रेंज गेली. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. स्थानिक पोलिस स्टेशन दूर होते. तिथे पोहचण्याचे मार्गही बंद झाले होते. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्कही करता येत नव्हता.

गावकऱ्यांनी पायवाटेने आणले...

मंगळवारी पाऊस उघडल्यानंतर त्यांनी गावातील स्थानिकांशी भेटून माहिती घेतली. तेव्हा त्यांना दरडी कोसळल्याची माहिती कळली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी वापस येण्याचा निर्णय घेतला. गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल चाळीस किलोमीटर पायी चालत आलो. रस्ते पूर्णत: वाहून गेले आहेत. तिथून वाहने भेटली. चंडीगडच्या जवळ आल्यानंतर कुटुंबाशी संपर्क केला. अर्ध्या रस्त्यापर्यंत शासनाची मदत पोहचली होती, असे प्रथमेश साखरे याने सांगितले.

पन्नास मीटरवर जमीन खचली...

आम्ही चंडीगडहून शानगडला फिरायला शुक्रवारी (दि. ७) रात्री निघालो. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पोहोचलो. आम्ही जिथे थांबलो तिथून जवळच असलेली पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेलो. सकाळी दहाच्या दरम्यान संततधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी मोबाईलचे नेटवर्क गेले. तिथून आमचा कुटुंबाशी व नातेवाइकांशी संपर्क तुटला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथून अगदी पन्नास मीटरवर जमीन खचली होती. तब्बल ९६ तासांनंतर मोबाईलला रेंज आली, असे कृष्णा भडके यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणSocialसामाजिकNatureनिसर्गtourismपर्यटनAssamआसाम