शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:53 IST

गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल ४० किलोमीटर पायी चालत आलो

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : आसाममधील शानगडला फिरायला गेलो होतो. दोन दिवस संततधार पाऊस सुरू होता. रस्त्यावरील वाहने पाण्यात वाहत जात होती. दरडी कोसळत होत्या. काय होतंय हे समजायच्या आत मोबाईलचे नेटवर्क गेले. कुटुंबाशी संपर्क होईना. पाऊस थांबल्यानंतर पूर ओसरला तरीही रस्त्यावर दीड ते दोन फुटांपर्यंत चिखल साचला होता. मदत मिळवायची तर कशी, असा प्रश्न होता. मात्र, नशीब बलवत्तर त्यामुळे आम्ही सुखरूप आलो. अशी भावना आसामच्या महापुरात अडकलेल्या चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना बोलून दाखवली.

चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके हे नोकरीनिमित्त चंडीगडला राहतात. तिथूनच जवळ असलेल्या शानगडला ते आपल्या ग्रुपसोबत फिरायला गेले. जाताना अगदी मस्त वातावरणाचा आनंद घेत ते मौज करत होते. शनिवारी, दि. ८ सकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने ते हॉटेलवरच थांबले. रविवारी मोबाईलची रेंज गेली. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. स्थानिक पोलिस स्टेशन दूर होते. तिथे पोहचण्याचे मार्गही बंद झाले होते. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्कही करता येत नव्हता.

गावकऱ्यांनी पायवाटेने आणले...

मंगळवारी पाऊस उघडल्यानंतर त्यांनी गावातील स्थानिकांशी भेटून माहिती घेतली. तेव्हा त्यांना दरडी कोसळल्याची माहिती कळली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी वापस येण्याचा निर्णय घेतला. गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल चाळीस किलोमीटर पायी चालत आलो. रस्ते पूर्णत: वाहून गेले आहेत. तिथून वाहने भेटली. चंडीगडच्या जवळ आल्यानंतर कुटुंबाशी संपर्क केला. अर्ध्या रस्त्यापर्यंत शासनाची मदत पोहचली होती, असे प्रथमेश साखरे याने सांगितले.

पन्नास मीटरवर जमीन खचली...

आम्ही चंडीगडहून शानगडला फिरायला शुक्रवारी (दि. ७) रात्री निघालो. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पोहोचलो. आम्ही जिथे थांबलो तिथून जवळच असलेली पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेलो. सकाळी दहाच्या दरम्यान संततधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी मोबाईलचे नेटवर्क गेले. तिथून आमचा कुटुंबाशी व नातेवाइकांशी संपर्क तुटला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथून अगदी पन्नास मीटरवर जमीन खचली होती. तब्बल ९६ तासांनंतर मोबाईलला रेंज आली, असे कृष्णा भडके यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणSocialसामाजिकNatureनिसर्गtourismपर्यटनAssamआसाम