शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विहिरीच्या पाणी वापरावरून वाद; आठ जणांनी मिळून केला एकावर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:51 IST

आठ जणांच्या तावडीतून सुटून जात असताना झाला गोळीबार

ठळक मुद्देआरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी केले

पिंपरी: सामाईक विहिरीच्या पाण्याचे हक्क आणि वापराच्या कारणावरून आठ जणांनी मिळून एकावर खुनी हल्ला केला. सुसगाव येथे गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या ही घटना घडली आहे. प्रमोद दशरथ ससार (वय 36, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून महेंद्र राम ससार, बजरंग राम ससार, सुरज हरिश्चंद्र पडवळ, वैभव हरिश्चंद्र पडवळ आणि अन्य चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससार आणि आरोपींमध्ये असलेल्या विहिरीच्या पाण्याचे हक्क आणि वापराच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यातून गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपींनी ससार यांना अडवले. सुरज पडवळ याने तलवारीने, महेंद्र, बजरंग आणि वैभव यांनी लोखंडी रॉडने तर अन्य आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना मारले. यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींच्या तावडीतून सुटून जात असताना आरोपींपैकी एकाने गोळीबार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWaterपाणी