शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्वीही अनेकदा नव्हता : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 7:33 PM

प्रजासत्ताकदिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्यात आला. त्याबद्दल बाेलताना चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

पिंपरी : ‘‘राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसल्याने राजकारण सुरू आहे. आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. कशाचेही खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडले जात आहे. चित्ररथाचा विषय तांत्रिक आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ या पूवीर्ही अनेकदा नव्हता. कारण ते ‘रोटेशन’ पद्धतीने ठरवलं जातं. दरवर्षी तीस ते चाळीस टक्के राज्यांचे चित्ररथ येतात. यंदा तांत्रिकरित्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल रोटेशनमधून बाहेर पडले. बऱ्याच देशांचे प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहायला येत असतात, सगळ्या राज्याचे चित्ररथ कंटाळवाणे होऊ शकतात.’’ असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी - चिंचवड भाजप शहराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तत्पूर्वी पाटील पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कोणताही प्रयत्न भाजप करणार नाही. निसर्गाप्रमाणेच राजकारणाचेही संतुलन बिघडले आहे, आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनच भाजप काम करु. खातेवाटपांवर ते म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळ खातेवाटप झाल्याबाबत आनंद आहे. मंत्र्यांनी आता उत्तम काम करावीत. नागरिकांच्या अडचणी समजून मार्ग काढावा. विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाही. महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भाजप करणार नाही.’’

‘‘महाराष्ट्रात खूप प्रामाणिकपणाचं राजकारण व्हायचे, पण यावेळी काय झाले हे माहीत नाही. अवेळी पाऊस झाला, गारा पडल्या, त्या जशा अनाकलनीय आहे. तसेंच महाराष्ट्रातील राजकारण नागरिकांना अनाकलनीय आहे. मतदान करताना नागरिकांनी निराश न होता अधिक सतर्क राहिले पाहिजे. भाबडेपणाने मतदान करून चालणार नाही.  निसर्गाप्रमाणेच राजकारणाचेही संतुलन बिघडले आहे. नागरिक आता अधिक विचारपूर्वक मतदान करतील. जातीचे, पैशांचे राजकारण संपणार आहे.’ असेही पाटील यावेळी म्हणाले.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा