शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये दाटीवाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:10 IST

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात.

ठळक मुद्देवाहनांची जीपीएस कुचकामी आधुनिक सुविधेचा बोलबालाखासगी व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूकवाहतूक समित्या निरर्थकशाळेत कागदोपत्री फक्त नोंदवाहनांची होत नाही तपासणी आरटीओचे नियम पायदळी

लोकमत पाहणी पिंपरी : पाठीवर न पेलणारे दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये अक्षरश: कोंबून बसविलेले विद्यार्थी अशा पद्धतीने रोजच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या समस्येवर तोडगा निघणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांना लहान वयात दाटीवाटीने रिक्षा, व्हॅनमधून प्रवास करावा लागतो आहे. खरे तर त्यांच्या खेळण्या बागडण्याच्या वयातील मुलांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी वाहतूक व्यवस्था गरजेची आहे. शाळेत जाण्यासाठीची व्हॅन, रिक्षा यामध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. अनेकदा अपघाताच्या दुर्घटना घडल्या आहेत. नाईलाजास्तव एखाद दुसऱ्या दिवसी दाटीवाटीने रिक्षात अथवा व्हॅनमध्ये बसून जाणे विद्यार्थी सहन करतील, मात्र रोजच त्यांना असा प्रवास करावा लागत असल्याने एक प्रकारे त्यांना ही शिक्षाच वाटू लागली आहे. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून पालकांनी दक्षता घ्यावी.......(संकलन : पराग कुंकूलोळ, शिवप्रसाद डांगे, प्रमोद सस्ते, औदुंबर पाडुळे, संदीप सोनार, बलभीम भोसले) 

शाळांची विद्यार्थी वाहतूक व्यवस्था कुचकामी सांगवी : सांगवी परिसरात विद्यार्थ्यांना शालेय बस व रिक्षा असो की व्हॅन यामध्ये अक्षरश: कोंबून व दाटीवाटीने शाळेत ने-आण केली जात आहे. परिसरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेली स्कूल बस व्यवस्था विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत असून, शाळा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सांगवी परिसरात अनेक इंग्रजी आणि सेमी माध्यमाच्या खासगी शाळा असून, या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवास भाडे आकारून शाळेकडून घरपोच वाहन व्यवस्था केली जाते.

परंतु अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच वाहनात संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी बसवण्यात येऊन शाळेत ने-आण केली जाते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यावाहनांची वेळोवेळी तपासणी होते का हे तपासले जात नाही. वाहने सुस्थितीत नसल्याचे दिसून येते तर बसमध्ये व्हॅनमध्ये अग्निशमन सुरक्षा व्यवस्था तसेच मदतनीस नसल्याचे दिसून येते............वाहतूक  व्यवस्थापन समित्या कागदावरच रहाटणी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी बस वाहतूक व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. परंतु, सद्य:स्थिती पाहता या व्यवस्थापन समित्या कागदावरच असल्याचे दिसते. काही ठिकाणी तर अनेक रिक्षा, स्कूल बस अथवा खासगी वाहनांमधून वाहतूक पोलिसांसमोरून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेले जातात. पैशांची बचत होते म्हणून अनेक पालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असूनही त्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेत पाठवतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शहरावर व्हॅनचा सुळसुळाट झाला आहे़ रस्त्यावर पाहावे तिकडे खासगी व्हॅन विद्यार्थी वाहतूक करताना दिसून येत आहेत................निगडी : स्कूल बस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शाळेत ने-आण करण्यासाठी ज्या खासगी व्हॅन वापरल्या जातात त्यात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याने हा प्रकार धोकादायक ठरू लागला आहे. पाल्याला सुरक्षित आणि वेळेत शाळेत पोहचता यावे म्हणून बरेचसे पालक आपल्या पाल्याला खासगी रिक्षाचालक, व्हॅनचालक यांच्या हवाली करत असतात. काही पालक आपल्या मुलांना शाळेच्या बसमध्ये पाठवत असतात, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात. बरेचसे विद्यार्थी नियमितपणे संपूर्ण प्रवासात उभे राहून असतात. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत. ..........*विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायकरिक्षामध्ये तर आठ ते दहा विद्यार्थी दाटीवाटीनं बसलेले तसेच काही विद्यार्थी उभे असतात. बरेचसे पालक आळीपाळीने आपापले विद्यार्थी शाळेत सोडविणे आणि त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी पार पडतात, यासाठी दुचाकीवर तीन ते चार विद्यार्थी दाटीवाटीनं बसवून धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करत असतात. शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेच्या फाटकाबाहेर बस, रिक्षा आणि पालकांची चारचाकी, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घोळक्याने बाहेर पडत असतात. यामुळे शाळा सुटल्यानंतर फाटकाबाहेरील आवारात आणि रस्त्यावर रोजच वाहतूककोंडी होत असते. सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी याच गर्दीतून मार्ग काढत असतात.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिस