शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये दाटीवाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:10 IST

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात.

ठळक मुद्देवाहनांची जीपीएस कुचकामी आधुनिक सुविधेचा बोलबालाखासगी व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूकवाहतूक समित्या निरर्थकशाळेत कागदोपत्री फक्त नोंदवाहनांची होत नाही तपासणी आरटीओचे नियम पायदळी

लोकमत पाहणी पिंपरी : पाठीवर न पेलणारे दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये अक्षरश: कोंबून बसविलेले विद्यार्थी अशा पद्धतीने रोजच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या समस्येवर तोडगा निघणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांना लहान वयात दाटीवाटीने रिक्षा, व्हॅनमधून प्रवास करावा लागतो आहे. खरे तर त्यांच्या खेळण्या बागडण्याच्या वयातील मुलांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी वाहतूक व्यवस्था गरजेची आहे. शाळेत जाण्यासाठीची व्हॅन, रिक्षा यामध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. अनेकदा अपघाताच्या दुर्घटना घडल्या आहेत. नाईलाजास्तव एखाद दुसऱ्या दिवसी दाटीवाटीने रिक्षात अथवा व्हॅनमध्ये बसून जाणे विद्यार्थी सहन करतील, मात्र रोजच त्यांना असा प्रवास करावा लागत असल्याने एक प्रकारे त्यांना ही शिक्षाच वाटू लागली आहे. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून पालकांनी दक्षता घ्यावी.......(संकलन : पराग कुंकूलोळ, शिवप्रसाद डांगे, प्रमोद सस्ते, औदुंबर पाडुळे, संदीप सोनार, बलभीम भोसले) 

शाळांची विद्यार्थी वाहतूक व्यवस्था कुचकामी सांगवी : सांगवी परिसरात विद्यार्थ्यांना शालेय बस व रिक्षा असो की व्हॅन यामध्ये अक्षरश: कोंबून व दाटीवाटीने शाळेत ने-आण केली जात आहे. परिसरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेली स्कूल बस व्यवस्था विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत असून, शाळा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सांगवी परिसरात अनेक इंग्रजी आणि सेमी माध्यमाच्या खासगी शाळा असून, या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवास भाडे आकारून शाळेकडून घरपोच वाहन व्यवस्था केली जाते.

परंतु अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच वाहनात संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी बसवण्यात येऊन शाळेत ने-आण केली जाते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यावाहनांची वेळोवेळी तपासणी होते का हे तपासले जात नाही. वाहने सुस्थितीत नसल्याचे दिसून येते तर बसमध्ये व्हॅनमध्ये अग्निशमन सुरक्षा व्यवस्था तसेच मदतनीस नसल्याचे दिसून येते............वाहतूक  व्यवस्थापन समित्या कागदावरच रहाटणी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी बस वाहतूक व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. परंतु, सद्य:स्थिती पाहता या व्यवस्थापन समित्या कागदावरच असल्याचे दिसते. काही ठिकाणी तर अनेक रिक्षा, स्कूल बस अथवा खासगी वाहनांमधून वाहतूक पोलिसांसमोरून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेले जातात. पैशांची बचत होते म्हणून अनेक पालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असूनही त्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेत पाठवतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शहरावर व्हॅनचा सुळसुळाट झाला आहे़ रस्त्यावर पाहावे तिकडे खासगी व्हॅन विद्यार्थी वाहतूक करताना दिसून येत आहेत................निगडी : स्कूल बस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शाळेत ने-आण करण्यासाठी ज्या खासगी व्हॅन वापरल्या जातात त्यात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याने हा प्रकार धोकादायक ठरू लागला आहे. पाल्याला सुरक्षित आणि वेळेत शाळेत पोहचता यावे म्हणून बरेचसे पालक आपल्या पाल्याला खासगी रिक्षाचालक, व्हॅनचालक यांच्या हवाली करत असतात. काही पालक आपल्या मुलांना शाळेच्या बसमध्ये पाठवत असतात, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात. बरेचसे विद्यार्थी नियमितपणे संपूर्ण प्रवासात उभे राहून असतात. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत. ..........*विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायकरिक्षामध्ये तर आठ ते दहा विद्यार्थी दाटीवाटीनं बसलेले तसेच काही विद्यार्थी उभे असतात. बरेचसे पालक आळीपाळीने आपापले विद्यार्थी शाळेत सोडविणे आणि त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी पार पडतात, यासाठी दुचाकीवर तीन ते चार विद्यार्थी दाटीवाटीनं बसवून धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करत असतात. शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेच्या फाटकाबाहेर बस, रिक्षा आणि पालकांची चारचाकी, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घोळक्याने बाहेर पडत असतात. यामुळे शाळा सुटल्यानंतर फाटकाबाहेरील आवारात आणि रस्त्यावर रोजच वाहतूककोंडी होत असते. सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी याच गर्दीतून मार्ग काढत असतात.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिस