शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

भिडे गुरुजींनी धारकरी होण्याऐवजी टाळकरी व्हावे म्हणजे तुकोबा समजेल : संभाजीमहाराज देहूकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 9:08 PM

पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्देमनुवादी दांभिक विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही. भिडे गुरुजींनी वारकऱ्यांची क्षमा मागून प्रायश्चित्त करावे

पिंपरी : संभाजी भिडे यांनी धारकरी होण्यापेक्षा टाळकरी व्हावे, म्हणजे त्यांना तुकोबाराय कळतील. कोण पुढे कोण मागे असला दांभिक मनुवादी विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही. गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, त्याचे भुंकेने न राहे, स्वभावाशी वरील काय, तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे धर्म...भिडे यांची भीड भाड ठेवण्याएवढे आम्ही नामर्द नाही, अशी टीका देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त संभाजीमहाराज देहूकर यांनी केली आहे.पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे. देहूकरमहाराज म्हणाले, तुकोबारायांचा रोखठोक भक्तीवाद देखील आम्हाला माहिती आहे. भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी आहेत. याच जाणिवेतून अशा लोकांचे खंडण आणि मंडण करण्यासाठी तुकोबारायांनी अभंग लिहून ठेवला आहे. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, तीक्ष्ण़ उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे  असे तुकोबारांयाचे शुद्ध विचार जगणारे आणि जागविणारे आम्ही वारकरी आहोत. भिडे गुरुंजीसारखा सांप्रत मंबाजी-दंभाजी होऊन वारकरी संप्रदायाच्या अस्मितेचा छळ करत आहे. आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन मांडले आहे. त्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबारायांच्या अभंगाचे दर्शन घेतले असते तर नाठाळ बुद्धी सोज्वळ झाली असती. मनुचे साक्षात्कारी वारसदार म्हणून घेणाऱ्या गुरूजींपी संतांच्या अभंगमय संतांच्या विचारांना वारकरी होऊन स्पर्श केला असता तर अशी नाठाळ आणि बुद्धीभेद करणारी असभ्य वक्तव्ये केली नसती. केवळ एका समाजाच्या भल्यासाठी मनुंनी जातीभेद वर्णभेद, लिंगभेद आणि धर्मभेद केला. कर्मकांडाच्या भिंती उभ्या करून वेदाला आणि देवाला कोंडून ठेवले. त्या सगळ्या कणखर भिंती उखडून टाकण्यासाठी ज्ञानोबारायांनी पसायदान , ज्ञानेश्वरी लिहिली. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा आकाशाऐवढा व्यापक भक्तीवाद तुकोबांनी जगापुढे ठेवला. गुरुजींनी वारकºयांची क्षमा मागून प्रायश्चित्त करावे. 

टॅग्स :dehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी