शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा : आकुर्डीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 8:48 PM

शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा आहे.  

ठळक मुद्देपुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आंदोलन

पिंपरी : संविधानाची पायमल्ली करून केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे या सरकारने आणले आहेत. याविरोधात शेतकरी व कामगारांची एकजूट झाली आहे. सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देशभरातील जनता मंगळवारी भारत बंद आंदोलनात सहभागी होईल, असा विश्वास पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणीसाठी शनिवारी आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकरी व कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीचे फलक गळ्यात घालून आंदोलकांनी या वेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, कामगार संघटना प्रतिनिधी वसंत पवार, मनोहर गडेकर, दिलीप पवार, अनिल रोहम, मनोज कांबळे, नरेंद्र बनसोडे, युवराज दाखले, काशिनाथ नखाते, वसीम इनामदार आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

डॉ. कैलास कदम म्हणाले, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र नवीन कायद्यामुळे कायम असलेले कामगार देखील बेरोजगारीच्या खाईत लोटले जाणार आहेत. शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा आहे.  

मानव कांबळे म्हणाले, शेतमजूर, शेतकरी आणि कामगार यांना न्याय देण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. उद्योगपतींच्या पैशावर हे सरकार स्थापन झालेले आहे. त्यांच्या विरोधात ‘जनशक्ती’ आता एकजूटीने लढणार आहे.

टॅग्स :akurdiआकुर्डीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप