शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..! तो फोन ठरला शेवटचा; पुण्याच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:16 IST

ईददिवशीच आम्ही भेटलो, गप्पा मारल्या, सोबत जेवणही केले, ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली, त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

नेहरूनगर (पिंपरी, जि. पुणे) : ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. बावीस वर्षांच्या तरण्याबांड देहाचा कोळसा झाला... पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथील इरफान समीर शेखची ही दर्दभरी दास्तान. एअर इंडियात क्रू मेंबर असलेल्या इरफानचा अहमदाबाद येथे गुरुवारी विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी शुक्रवारी सकाळी समजली आणि अवघे शहर सुन्न झाले.

इरफानने अम्मी-अब्बू-भय्यासोबत आठवडाभरापूर्वी साजरी केलेली बकरी ईद शेवटचीच ठरली. इरफान शेख एअर इंडिया कंपनीत कॅबिन क्रू म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत होता. संत तुकारामनगर परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूलमध्ये तो दहावीपर्यंत, तर पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकला. मुंबईत हवाई वाहतुकीतील तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो आधी विस्तारा कंपनीत आणि नंतर एअर इंडियात दाखल झाला. वडील समीर नूरमहंमद शेख यांचा पराठ्याचा व्यवसाय, तर आई तसलीम गृहिणी आहेत. मोठा भाऊ अमीर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात नोकरीस आहे.

बकरी ईद साजरी करण्यासाठी सुटी घेऊन इरफान आठ दिवसांपूर्वी घरी आलेला. आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा यांच्यासोबत ईद साजरी करून ९ जून रोजी मुंबई येथे कामावर गेला. गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानात क्रू मेंबर म्हणून त्याची ड्यूटी होती. विमानात जाण्यापूर्वी आईला फोन करून त्याने निरोप दिला आणि काही वेळातच काळाने घात केला. त्यानंतर एअर इंडियाकडून त्याच्या घरी कळविण्यात आले. आई-वडील आणि मोठा भाऊ तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले. शुक्रवारी सकाळी त्याच्या चुलत्यांकडून ही बातमी परिसरात समजली. मनमिळाऊ स्वभावाच्या उमद्या तरुणाच्या मृत्यूने अवघ्या शहरावर शोककळा पसरली.

शंकेची पाल चुकचुकली आणि...

इरफान नेहमी विमानात बसण्यापूर्वी आईला फोन करून कळवत असे. गुरुवारच्या दुर्घटनेनंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहताना आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घरातील सगळेच सैरभैर झाले. त्यानंतर काही वेळातच फोन आला आणि ती बातमी ऐकावी लागली.

इरफान सुटीवर आला की मला भेटायचा यायचा. ईददिवशीच आम्ही भेटलो होतो. गप्पा मारल्या. सोबत जेवणही केले. ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली. त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. - फिरोज शेख, चुलते, संत तुकारामनगर

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAccidentअपघातGujaratगुजरातairplaneविमानFamilyपरिवारDeathमृत्यूAir Indiaएअर इंडिया