शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पिंपरी शहरास २३५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार; तूर्त दिवसाआडच पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:52 IST

दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू

ठळक मुद्देपाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठापुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरू रावेत येथील पंपगृहातील १९ पंप चोवीस तास सुरू

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून, पवना नदीतील रावेत येथील केंद्राची शंभर एमएलडी क्षमता वाढविणे, इंद्रायणी नदीतून शंभर एमएलडी आणि वाघोली योजनेतून ३५ असे एकूण २३५ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहील. त्याला पावसाळादेखील उजाडेल किंवा त्यापुढेदेखील कालावधी लागेल. त्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरास पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला पवना धरणातून प्रतिदिन केवळ ४२० एमएलडी पाणीउपसा करण्याची परवानगी आहे. महापालिका पाचशे एमएलडी पाणी उचलत आहे. त्यापुढील पाण्यासाठी महापालिका दंड भरावा लागत आहे. अधिक पाणी उपलब्ध असल्यावर दंड भरून महापालिकेला जादा पाणी दिले जाते. पवना नदीतून रावेत बंधारा येथील पालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. मात्र, पाणी उचलण्याची क्षमता कमी आहे. ही क्षमता वाढविण्याच्या विषयाला मंजुरी दिली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यशहरात पाणी कपात केलेली नाही. दिवसाआड पुरसे पाणी दिले जात आहे. रावेत येथील पंपगृहातील १९ पंप चोवीस तास सुरू आहेत. त्यासाठी पंपिंगची क्षमता वाढविण्यात येणार आहे. जुने पंप काढून मोठ्या क्षमतेचे नवीन पंप टाकले जाणार आहेत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच सेक्टर तेवीसमधील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या पाचशे एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. या क्षमतेत ५८० एमएलडीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. विजेचा भारदेखील वाढवून घेतला जाणार आहे. शंभर एमएलडी अधिकचे पाणी निर्माण होऊ शकते. त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

इंद्रायणीचाही पर्यायपुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह महापालिकेस हस्तांतरित होणार आहे. त्यातून ३५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. त्यानंतरसुद्धा दररोज पाणीपुरवठा करता येऊ शकेल. तसेच देहू बंधाऱ्यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून पाणीपुरवठा करता येईल. देहूलाही पाणी प्रक्रिया करण्यासाठी मदत करणार असल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीshravan hardikarश्रावण हर्डिकर