शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पिंपरी शहरास २३५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार; तूर्त दिवसाआडच पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:52 IST

दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू

ठळक मुद्देपाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठापुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरू रावेत येथील पंपगृहातील १९ पंप चोवीस तास सुरू

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून, पवना नदीतील रावेत येथील केंद्राची शंभर एमएलडी क्षमता वाढविणे, इंद्रायणी नदीतून शंभर एमएलडी आणि वाघोली योजनेतून ३५ असे एकूण २३५ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहील. त्याला पावसाळादेखील उजाडेल किंवा त्यापुढेदेखील कालावधी लागेल. त्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरास पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला पवना धरणातून प्रतिदिन केवळ ४२० एमएलडी पाणीउपसा करण्याची परवानगी आहे. महापालिका पाचशे एमएलडी पाणी उचलत आहे. त्यापुढील पाण्यासाठी महापालिका दंड भरावा लागत आहे. अधिक पाणी उपलब्ध असल्यावर दंड भरून महापालिकेला जादा पाणी दिले जाते. पवना नदीतून रावेत बंधारा येथील पालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. मात्र, पाणी उचलण्याची क्षमता कमी आहे. ही क्षमता वाढविण्याच्या विषयाला मंजुरी दिली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यशहरात पाणी कपात केलेली नाही. दिवसाआड पुरसे पाणी दिले जात आहे. रावेत येथील पंपगृहातील १९ पंप चोवीस तास सुरू आहेत. त्यासाठी पंपिंगची क्षमता वाढविण्यात येणार आहे. जुने पंप काढून मोठ्या क्षमतेचे नवीन पंप टाकले जाणार आहेत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच सेक्टर तेवीसमधील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या पाचशे एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. या क्षमतेत ५८० एमएलडीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. विजेचा भारदेखील वाढवून घेतला जाणार आहे. शंभर एमएलडी अधिकचे पाणी निर्माण होऊ शकते. त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

इंद्रायणीचाही पर्यायपुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह महापालिकेस हस्तांतरित होणार आहे. त्यातून ३५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. त्यानंतरसुद्धा दररोज पाणीपुरवठा करता येऊ शकेल. तसेच देहू बंधाऱ्यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून पाणीपुरवठा करता येईल. देहूलाही पाणी प्रक्रिया करण्यासाठी मदत करणार असल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीshravan hardikarश्रावण हर्डिकर