लग्न ठरताच प्रत्येक नवरीने खायला हवे ‘हे’ पदार्थ, ८ दिवसांत येईल चेहऱ्यावर तेज, ब्रायडल फेशियलची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 16:21 IST2026-01-22T15:45:36+5:302026-01-22T16:21:44+5:30

आता पुन्हा लग्नसराईचे दिवस जवळ यायला लागले आहेत. पुढच्या काही दिवसांत ज्यांची लग्नं आहेत त्या नवऱ्या मुलींना त्यांच्या त्वचेची, सौंदर्याची काळजी वाटणं अगदी साहजिक आहे.

म्हणूनच आता अगदी आजपासूनच पुढे सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे खायला सुरुवात करा. हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमची त्वचा आतून स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होईल.

यापैकी पहिला पदार्थ आहे चिया सीड्स. यामध्ये ओमेगा ३ भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा आजून हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

दुसरा पदार्थ आहे सुर्यफुलाच्या बिया. त्यांच्यामधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळते. ते त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते आणि एजिंग प्रोसेस हळूवार करण्यास मदत होते. त्वचेवरचे पिंपल्स कमी होण्यासही मदत होते.

डार्क चॉकलेट आवडत असेल तर त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी ते देखील तुम्ही खाऊ शकता. पण फक्त एवढं लक्षात घ्या की त्यामध्ये ७० टक्क्यांपेक्षाही जास्त कोको पावडर असायला हवं. कारण डार्क चॉकलेटमुळे त्वचेचा डलपणा कमी होतो. त्वचा फ्रेश राहाते.

रताळे खाणेही त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. रताळ्यांमध्ये असणारे बीटा कॅरोटीन त्वचा निरोगी, नितळ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

टोमॅटोमध्ये असणारे लायकोपीन पिंपल्स, टॅनिंग, त्वचेवरचे ओपन पोअर्स कमी करण्यास मदत करते.

ग्रीन टी देखील नियमितपणे घ्या. ग्रीन टी घेतल्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीर आतून शुद्ध झालं की त्याचा आपोआपच त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. ही माहिती dr.smita_peachtreeclinic या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

















