शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha Bandhan 2019 : नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:29 PM

1 / 7
राखी पौर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.
2 / 7
भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम ठेवण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
3 / 7
एखादं नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रेमासोबतच सन्मानही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा आदर करा. अनेकदा आपण भावंडांची मस्करी करतो मात्र यामुळे ते दुखावले जाण्याची शक्यता असते.
4 / 7
अनेकदा बहिण भाऊ एकमेकांशी पटत नसल्याने बोलत नाहीत. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे सुख, दु:ख शेअर करा. तुमच्या भावना व्यक्त करा म्हणजे नात्यात मोकळेपणा येईल.
5 / 7
एकच गोष्ट सगळ्यांना आवडते असं नाही. कारण प्रत्येकाच्या आवडी-निवडी या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे भावंडांच्या आवडी लक्षात घ्या यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल.
6 / 7
भावाबहिणींमध्ये काही कारणांवरून नेहमी भांडण होत असतात. मात्र भांडणं झाल्यावर जास्त वेळ राग मनात धरून ठेवू नका. मारामारी करू नका. तर आपापसात बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
7 / 7
भांडण झाल्यावर अनेकदा रागाच्या भरात चुकीचे शब्द बाहेर पडतात. मात्र असं करू नका यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन